लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

हेल्मेट सक्ती सह वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यावर भद्रावती पोलिसांची कारवाई

हेल्मेट सक्ती सह वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यावर भद्रावती पोलिसांची कारवाई
०एक लाख रुपयांचा दंड वसूल०

भद्रावती, तालुका प्रतिनिधी:- हेल्मेट सक्तीसह वाहतुकीचे अन्या नियम मोडणाया शहरातील वाहन चालकावर कारवाई करत एकाच दिवशी एक लक्ष रुपयाचा दंड भद्रावती पोलिसांनी वसूल केला .या कारवाईमुळे शहरातील वाहनचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सदर कारवाई दिनांक 18 मे रोज बुधवारला भद्रावती पोलिसांनी शहरातील पेट्रोल पंप चौकात केले.
गेल्या काही महिन्यात हेलमेट न वापरल्यामुळे अपघातात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले या पार्श्वभूमीवर वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यानी काही दिवसापूर्वी जनजागृती मोहीम राबवून दुचाकी वाहन चालकांना हेलमेट वापरण्याचे तथा अन्य वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान केले होते. नियम मोडणाऱ्या तथा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला होता. त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईत दिवसभरात जवळपास दोनशे वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात हेल्मेट न वापरणे ,गाडीवर तिबल सीट जाणे ,वाहन चालवताना लायसन्स जवळ न बाळगने, गाड्या भरदार चालविणे, अल्पवयीन मुलांकडून गाड्या चालविणे यासह वाहतुकीचे अन्य नियम मोडणायावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून वाहनचालकांकडून एक लक्ष रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले असले तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा ,मस्के, बोढे यांच्यासह 25 महिला पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
@ जिल्हा क्षेत्रात हेल्मेट न वापरल्याने अनेक अपघातातून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले हे टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक यांचे आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यापुढे वाहन चालकांनी वाहन चालविताना हेल्मेट वापरावे व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे.
@गोपाल भारती@
ठाणेदार, पोलीस स्टेशन भद्रावती.

Comments