वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

पूरप्रकरणाची राज्यस्तरावर दखल; महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे उच्चस्तरीय बैठकीचे निर्देश.आकाश गोपाळराव वानखडे यांच्या पाठपुराव्याला यश; दोषींवर कठोर कारवाई व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

 पूरप्रकरणाची राज्यस्तरावर दखल; महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे उच्चस्तरीय बैठकीचे निर्देश.

आकाश गोपाळराव वानखडे यांच्या पाठपुराव्याला यश; दोषींवर कठोर कारवाई व शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

भद्रावती | दि. ४ जुलै २०२६
मौजा बेलोरा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर येथे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडविल्यामुळे निर्माण झालेल्या कृत्रिम पूरस्थिती, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान तसेच पुनर्वसनाच्या प्रलंबित प्रश्नाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष, हनुमान व्यायाम शाळा किल्लोनीचे अध्यक्ष आणि तंटामुक्ती समिती, गट ग्रामपंचायत कढोलीचे अध्यक्ष आकाश गोपाळराव वानखडे यांनी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात बेलोरा परिसरातील नैसर्गिक नाल्याचा प्रवाह संबंधित कंपनीकडून अडविल्यामुळे कृत्रिम पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शेकडो एकर शेतीचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या प्रकरणी महसूल, जलसंपदा, जलसंधारण, कृषी, खनिकर्म व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध विभागांकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची माहितीही त्यांनी दिली.
या निवेदनाची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी संबंधित सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे तातडीने उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या प्रशासकीय व कायदेशीर कारवाईबाबत तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
आकाश गोपाळराव वानखडे यांनी निवेदनाद्वारे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत—
राज्यस्तरीय उच्चस्तरीय चौकशी समितीची तातडीने नियुक्ती करावी.
संबंधित कंपनी व जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS), पर्यावरण संरक्षण अधिनियम, जल (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम आणि इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करावी.
नैसर्गिक नाल्याचा मूळ प्रवाह तातडीने पूर्ववत करण्यात यावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई व आवश्यक मदत द्यावी.
पुनर्वसनासह सर्व प्रलंबित मागण्यांची तातडीने पूर्तता करावी.
भेटीनंतर आकाश गोपाळराव वानखडे म्हणाले, "बेलोरा परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना न्याय मिळेपर्यंत माझा संघर्ष सुरूच राहील. शासन स्तरावर या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून दोषींवर कठोर कारवाई आणि नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
बेलोरा पूरप्रकरणाची राज्य शासनाने घेतलेली दखल आणि महसूलमंत्र्यांनी दिलेले उच्चस्तरीय बैठकीचे निर्देश यामुळे या प्रकरणात लवकरच महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments