वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आनंदवन चौक-रत्नमाला चौकात वाहतूक सिग्नल कधी बसणार? आनंदवन चौक ते बोर्डा चौक स्ट्रीट लाईट बदलण्याची नागरिकांची मागणी.

आनंदवन चौक-रत्नमाला चौकात वाहतूक सिग्नल कधी बसणार? आनंदवन चौक ते बोर्डा चौक स्ट्रीट लाईट बदलण्याची नागरिकांची मागणी.

रस्ता दुरुस्तीमुळे वाहतुकीची कोंडी, खड्डे, अपुरा प्रकाश आणि वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप

वरोरा | दि. ५ जुलै २०२६/चेतन लूतडे 

वरोरा शहरातील देशपांडे पेट्रोल पंप ते बोर्डा चौक या  महामार्गावरील रस्ताचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे. या कामामुळे नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असून वाहनचालक आणि नागरिकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे. अपूर्ण रस्ता, खड्डे, वाहतुकीची कोंडी आणि अपुरा प्रकाश यामुळे या मार्गावरील अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका ऑटोचा खोल खड्ड्यात पडून भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढी गंभीर घटना घडूनही संबंधित यंत्रणेकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
रात्रीच्या वेळी या मार्गावरील अनेक स्ट्रीट लाईट बंद असतात, तर सुरू असलेल्या दिव्यांचाही प्रकाश रस्त्यावर पुरेशा प्रमाणात पडत नसल्याची तक्रार आहे. कमी क्षमतेचे दिवे बसविण्यात आल्याने पावसाळ्यात दृश्यमानता आणखी कमी होते. परिणामी भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना खड्डे आणि सुरू असलेले काम वेळेत दिसत नाही, जनावरे रोडवर बसून असतात  त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो.
सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकीस्वार आणि ऑटोचालकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. नागरिकांनी तातडीने खड्डे बुजविणे, आवश्यक त्या ठिकाणी इशारा फलक, बॅरिकेड्स आणि रात्री परावर्तित होणारे सुरक्षा चिन्ह लावण्याची मागणी केली आहे.
यापूर्वी वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण संजय देवतळे यांनी आनंदवन चौक आणि रत्नमाला चौक येथे वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही या दोन्ही चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे चौकांमध्ये वाहतुकीची मोठी कोंडी होत असून भरधाव वाहने थेट काम सुरू असलेल्या भागात येऊन धडकण्याच्या घटना घडत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आनंदवन चौक आणि रत्नमाला चौक परिसरात रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची समस्या अधिक गंभीर झाली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असले तरी वाढत्या वाहनसंख्येमुळे तेही अपुरे पडत आहेत. पावसाळ्यात ही समस्या आणखी तीव्र होत असून नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक बंडू देऊळकर यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे. आनंदवन चौक व रत्नमाला चौक येथे तातडीने वाहतूक सिग्नल बसविणे, आनंदवन चौक ते बोर्डा चौक या मार्गावरील निकृष्ट व अपुऱ्या क्षमतेचे स्ट्रीट लाईट बदलून उच्च क्षमतेचे एलईडी दिवे बसविणे, अतिक्रमण हटविणे आणि रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.
नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर परिषद आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
.............
पत्रकार बंधूनी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार करण देवतळे यांना शुभेच्छा दिल्या.

Comments