1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

किरकोळ वादातून हल्ला; विट मारून युवक जखमी, दुचाकीचेही नुकसान

किरकोळ वादातून हल्ला; विट मारून युवक जखमी, दुचाकीचेही नुकसान

वरोरा : कॉलरी वार्ड परिसरात किरकोळ वाहन वादातून दोन युवकांनी एका मासेविक्रेत्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या मारहाणीत जखमीच्या दुचाकीचेही नुकसान झाल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक विठ्ठल रूयारकर (वय 41), रा. आझाद वार्ड, वरोरा हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात. दिनांक 25 मे रोजी रात्री सुमारे 10 वाजताच्या दरम्यान ते व त्यांचा मित्र बालाजी गजानन नान्ने हे दोघे मोटारसायकलने बालाजी नान्ने यांच्या घरी जेवणासाठी जात होते.
दरम्यान, कल्याणेश्वर बजरंगबली मंदिरासमोर कॉलरी वार्ड येथे समोरून येणारा अल्ताफ अन्सारी हा मोटारसायकल घसरून खाली पडला. त्यानंतर त्याने बालाजी नान्ने यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. त्यावेळी कार्तिक रूयारकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता अल्ताफ अन्सारी याने त्यांच्या गालावर थपडा मारल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यानंतर अल्ताफ अन्सारी याने फोन करून समीर पठाण याला घटनास्थळी बोलावले. काही वेळाने दोघेही बालाजी नान्ने यांच्या घराजवळ पोहोचले. त्यावेळी कार्तिक रूयारकर हे आपल्या अॅक्टिव्हा दुचाकीवर बसले असताना अल्ताफ अन्सारी याने त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली व डोक्यावर विट मारल्याने ते जखमी झाले. तसेच समीर पठाण यानेही मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या घटनेत अॅक्टिव्हा दुचाकीला लाथ मारून खाली पाडल्याने वाहनाच्या उजव्या बाजूच्या पॅनलचे नुकसान झाले असून सुमारे 5 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी अल्ताफ अन्सारी व समीर पठाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत मारहाण, दुखापत करणे, शिवीगाळ, धमकी व मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तरवार करीत आहेत.

Comments