1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

भाचाला वाचवताना मामाचा दुर्दैवी मृत्यू; अवैध रेती उत्खननावरून संताप, चौकशीची मागणी

भाचाला वाचवताना मामाचा दुर्दैवी मृत्यू; अवैध रेती उत्खननावरून संताप, चौकशीची मागणी

वरोरा-चेतन लूतडे 28/5/2026

 तालुक्यातील केळी गावाजवळ वना नदी पात्रात घडलेल्या दुर्दैवी घटनेत भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना दि. 27 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या दरम्यान घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, राहुल कोळसे (वय 35, रा. शेकापूर बाई, ता. हिंगणघाट) हे इतर दोघांसह नदीपात्रात तयार करण्यात आलेल्या रस्त्यावरून जात होते. यावेळी नदीतील खोल पाण्याच्या खड्ड्यात भाचा अडकल्याचे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी राहुल कोळसे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, अंदाजे 40 फूट खोल खड्ड्यात ते स्वतःच अडकले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रात निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे हा बळी गेल्याचा आरोप करण्यात येत आहे.


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगणघाटचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनात राहुल कोळसे यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्वंकष चौकशी करून संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

तसेच शेकापूर (बाई) आणि केळी परिसरातील नदी घाटांमध्ये 3 ते 4 किलोमीटरपर्यंत झालेल्या अवैध रेती उत्खननाचे मोजमाप करून शासनाचा महसूल वसूल करावा, चोरीचे रेती साठे व यंत्रसामग्री जप्त करावी आणि शेकापूर (बाई), शेकापूर (येळी), कोल्ही, खेकडी, बामर्दा, दारोडा, घाट सावली यांसह अन्य अवैध रेती घाट कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे अवैध रेती उत्खननाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

.         राहुल कोळसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 




Comments