1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम यशस्वी


पाचगाव (ठा.) येथे बाल सुसंस्कार शिबिराचा समारोप : विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविणारा उपक्रम यशस्वी

चेतन लूतडे 26/5/26

वरोरा, ता. २५ मे – वरोरा तालुक्यातील पाचगाव (ठाकरे) येथे श्री गुरुदेव सुसंस्कार शिबिर समिती, टेंमुर्डा यांच्या वतीने आयोजित बाल सुसंस्कार शिबिर उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाले. हे शिबिर सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आले असून, यावर्षी शेकडो बालकांचा सहभाग होता.

१६ मे रोजी सायंकाळी पाच वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते. १६ ते २५ मे २०२४ या कालावधीत पार पडलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना ग्रामगीता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार समजावून देत, त्यांच्या जीवनमूल्यांचा अभ्यास करून सद्गुणांची पेरणी करण्यात आली.
शिबिराचे आयोजन जनार्दन देठे (प्रमुख मार्गदर्शक) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. माणिक डुकरे (व्यवस्थापक), शामराव काळे (अध्यक्ष), हितेश घुगल (उपाध्यक्ष), मनोज ढोके (सचिव) तसेच नियोजन प्रमुख आशिष माणुसमारे, शैलेश खिरटकर यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना, सामुदायिक ध्यान, योग व प्राणायाम, भक्तिसंगीत, वाद्य प्रशिक्षण (टाळ, खंजिरी, तबला, हार्मोनियम), भजन गायन, संत वाङ्मय अभ्यास, मैदानी खेळ (लाठी-काठी, कुस्ती, कराटे, मल्लखांब, लेझीम) या क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा रुजविण्यास मदत झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Comments