1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

शेतकऱ्याच्या गोठ्याला आगजवळपास चार लाखाचे नुकसान आल्फर येथील शेतशिवारातील घटना

शेतकऱ्याच्या गोठ्याला आग

जवळपास चार लाखाचे नुकसान

 आल्फर येथील शेतशिवारातील घटना

 वरोरा
     तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने एक बैलाचा मृत्यु तर जनावरांचा चारा व शेतिउपयोगी अवजारे जळून खाक झाले.शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाले असून सदर घटना २०मे २०२६ ला सकाळी १० .४५ वाजताचे दरम्यान घडली.
    आल्फर येथील पीडित शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी ,व शेतिउपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता.आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा,आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग लागली हि बातमी पीडित शेतकऱ्याला शेतशिवारात असणाऱ्या लोकांनी पीडित शेतकऱ्याला दिली.तेव्हा शेतकरी शेतात गेला तर सर्व साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दृश्य दिसले.वरोरा नगरपरिषद चे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.जवळपास शेतकऱ्याचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे.घटनास्थळाचा पंचनामा तलाठी यांनी केला असून त्यावेळेस गावातील पोलीस पाटील हजर होते.पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित झाले.

    ऐन शेती हंगामातच दिड लाखाची बैल जोडी आगीचे कवेत
   शेतकऱ्याचा शेती हंगाम नुकताच सुरू होणार याचवेलेस बैलजोडी आगीने कवेत घेतली.पीक कर्जामध्ये बैलजोडी घ्यावी की शेती करावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.प्रशासनाने पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Comments