वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शेतकऱ्याच्या गोठ्याला आगजवळपास चार लाखाचे नुकसान आल्फर येथील शेतशिवारातील घटना

शेतकऱ्याच्या गोठ्याला आग

जवळपास चार लाखाचे नुकसान

 आल्फर येथील शेतशिवारातील घटना

 वरोरा
     तालुक्यातील आल्फर येथील शेतशिवारात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने एक बैलाचा मृत्यु तर जनावरांचा चारा व शेतिउपयोगी अवजारे जळून खाक झाले.शेतकऱ्याचे जवळपास ४ लाखाचे नुकसान झाले असून सदर घटना २०मे २०२६ ला सकाळी १० .४५ वाजताचे दरम्यान घडली.
    आल्फर येथील पीडित शेतकरी सुखदेव मारोती गराटे वय ७५ यांच्याकडे १० एकर शेती असून त्याच शेतात जनावरांसाठी ,व शेतिउपोयोगी अवजारे ठेवण्यासाठी टीनाचा बंडा तयार केला होता.आगीची घटना घडली त्यावेळेस दोन बैल , चारा,आणि ८० स्प्रिंकल पाईप बंड्यात ठेवले होते.आगीमध्ये दोन बैलांपैकी एका बैलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.स्प्रींकल पाईप पूर्ण जळून खाक झाले आहे. गोठ्याला आग लागली हि बातमी पीडित शेतकऱ्याला शेतशिवारात असणाऱ्या लोकांनी पीडित शेतकऱ्याला दिली.तेव्हा शेतकरी शेतात गेला तर सर्व साहित्याची राखरांगोळी झाल्याचे दृश्य दिसले.वरोरा नगरपरिषद चे अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.जवळपास शेतकऱ्याचे ४ लाखाचे नुकसान झाले आहे.घटनास्थळाचा पंचनामा तलाठी यांनी केला असून त्यावेळेस गावातील पोलीस पाटील हजर होते.पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा उपस्थित झाले.

    ऐन शेती हंगामातच दिड लाखाची बैल जोडी आगीचे कवेत
   शेतकऱ्याचा शेती हंगाम नुकताच सुरू होणार याचवेलेस बैलजोडी आगीने कवेत घेतली.पीक कर्जामध्ये बैलजोडी घ्यावी की शेती करावी असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.प्रशासनाने पीडित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

Comments