1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वॉर्डातील कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांचा अनोखा निषेध

वॉर्डातील कचऱ्याच्या प्रश्नावरून नगरपालिकेत काँग्रेस नगरसेवकांचा अनोखा निषेध

चेतन लूतडे. 8/5/26


वरोरा : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचून राहिल्याने आणि नाल्यांची साफसफाई होत नसल्याच्या मुद्द्यावरून नगरपालिकेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नगरपालिकेच्या कार्यालयात नालीतील घाण टाकून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला.
याबाबत बोलताना नगरसेवक राज खंडारे यांनी सांगितले की, प्रभागातील कचरा व नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न अनेक वेळा सभागृहात मांडण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेच्या कार्यालयात आंदोलनकर्त्यांनी नाल्यातील घाण आणून टाकत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. या प्रकारामुळे काही काळ कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. पुढील कारवाईबाबत पोलीस प्रशासन तपास करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर शहरात विविध चर्चा रंगू लागल्या असून, “सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनाच प्रशासनाकडे अशा पद्धतीने न्याय मागावा लागत असेल, तर सामान्य नागरिकांनी आपल्या समस्यांसाठी कुठे दाद मागायची?” असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


Comments