1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**

**मानधन थकल्याने आशा सेविकांचा संताप; चंद्रपूर जिल्हा परिषदेवर धडक, २१ एप्रिलपासून मुंबईत बेमुदत संपाचा इशारा!**

*चंद्रपूर:*अंकूश अवथे 

 "सहा महिन्यांचे मानधन थकले आहे, आम्ही आमचे कुटुंब पोसायचे कसे?" असा संतप्त सवाल करत आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेने गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयावर जोरदार धडक दिली. राज्य उपाध्यक्ष कॉ. विनोद झोडगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारो महिला कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले.
ऑक्टोबर २०२५ पासून केंद्र सरकारकडून मिळणारे मानधन प्रलंबित असल्याने आशा सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. निवेदनात प्रामुख्याने आशा व गट प्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ करणे, आणि ७० वर्षांवरील लाभार्थी नोंदणी यांसारख्या ऑनलाइन कामांसाठी अत्याधुनिक अँड्रॉइड मोबाईल व डेटा पॅक पुरवणे या मागण्या करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत सुविधा मिळत नाही, तोपर्यंत 'मात्रा ऍप'वरील कामाची सक्ती करू नये, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत केंद्र व राज्य सरकारला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास व दिलेल्या विविध मागण्याची पुर्तता न झाल्यास २१ एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी तीव्र आंदोलन आणि बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात कॉ. निकिता नीर, सुहासिनी वाकडे, ममता भीमटे यांच्यासह जिल्ह्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments