1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा: शाम ठेंगडी /25/3/26
ग्रामीण भागाची नाळ असलेल्या वरोडा पंचायत समितीत आर्थिक वर्षाच्या शेवटी अंधारच पाहायला मिळाला. सप्टेंबर २०२५ पासून वीजबिल थकीत असल्याने महावितरणने बुधवारी (दि. २५ मार्च) वीजपुरवठा खंडित केला. यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.

पंचायत समितीचे तब्बल १८० दिवसांहून अधिक काळापासून ५१ हजार ५८० रुपयांचे वीजबिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल भरणा न केल्याने महावितरणने ही कठोर कारवाई केली. वीज खंडित झाल्याने संगणकाधारित सर्व कामे, ऑनलाइन सेवा, शासकीय योजनांचा अहवाल सादरीकरण, निधी वितरणासह अनेक महत्त्वाची कामे ठप्प पडली. मात्र, काही वेळाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

आकस्मिक निधी अप्राप्त : पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी ‘तभा’शी बोलताना सांगितले की, पंचायत समितीला मिळणारा आकस्मिक निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. मार्च संपत आला तरी हा निधी न मिळाल्याने वीजबिल, वाहनांसाठी डिझेल पुरवठा आणि इतर आकस्मिक खर्च करणे अवघड झाले आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत कामासाठी आलेल्या नागरिकांना या कारवाईमुळे ताटकळत बसावे लागले. अनेकजण निराश होऊन परत गेले. आर्थिक वर्षाच्या अखेरीस अशी कारवाई झाल्याने कामांची गर्दी वाढली असतानाच प्रशासनाला या संकटाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आकस्मिक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Comments