वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा पंचायत समितीत अंधार; वीज बिल थकीत, कनेक्शन खंडित.

वरोडा: शाम ठेंगडी /25/3/26
ग्रामीण भागाची नाळ असलेल्या वरोडा पंचायत समितीत आर्थिक वर्षाच्या शेवटी अंधारच पाहायला मिळाला. सप्टेंबर २०२५ पासून वीजबिल थकीत असल्याने महावितरणने बुधवारी (दि. २५ मार्च) वीजपुरवठा खंडित केला. यामुळे काही काळ कार्यालयीन कामकाज ठप्प झाले होते.

पंचायत समितीचे तब्बल १८० दिवसांहून अधिक काळापासून ५१ हजार ५८० रुपयांचे वीजबिल थकीत होते. वारंवार सूचना देऊनही बिल भरणा न केल्याने महावितरणने ही कठोर कारवाई केली. वीज खंडित झाल्याने संगणकाधारित सर्व कामे, ऑनलाइन सेवा, शासकीय योजनांचा अहवाल सादरीकरण, निधी वितरणासह अनेक महत्त्वाची कामे ठप्प पडली. मात्र, काही वेळाने वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

आकस्मिक निधी अप्राप्त : पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी ‘तभा’शी बोलताना सांगितले की, पंचायत समितीला मिळणारा आकस्मिक निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. मार्च संपत आला तरी हा निधी न मिळाल्याने वीजबिल, वाहनांसाठी डिझेल पुरवठा आणि इतर आकस्मिक खर्च करणे अवघड झाले आहे. यामुळे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

पंचायत समितीत कामासाठी आलेल्या नागरिकांना या कारवाईमुळे ताटकळत बसावे लागले. अनेकजण निराश होऊन परत गेले. आर्थिक वर्षाच्या अखेरीस अशी कारवाई झाल्याने कामांची गर्दी वाढली असतानाच प्रशासनाला या संकटाचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी आकस्मिक निधी त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Comments