1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा शहराला नवीन जिल्हा बनवण्याची आमदार देवतळे यांची मागणी

वरोरा – चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहराला नवनिर्मित जिल्ह्याचे मुख्यालय बनवण्याची मागणी स्थानिक आमदार करण संजय देवतळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.

आमदार देवतळे यांनी मंत्री बावनकुळे यांना पाठवलेल्या पत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व भद्रावती, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, मारेगाव व झरी जामणी तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर या तालुक्यांचा समावेश असलेला स्वतंत्र जिल्हा निर्माण करावा, अशी विनंती केली आहे. या सर्व तालुक्यांसाठी वरोरा हे भौगोलिकदृष्ट्या मध्यवर्ती व सर्वात सोयीचे ठिकाण असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
वरोरा शहराची लोकसंख्या ५० हजारांहून अधिक असून जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असलेली सर्व वैशिष्ट्ये येथे पूर्ण होत असल्याचे आमदार देवतळे यांनी सांगितले. जिल्हा कार्यालयासाठी मोठ्या प्रमाणात शासकीय जमीन व इमारती उपलब्ध असून फारसा खर्च न करता कमी वेळात प्रशासकीय यंत्रणा उभारता येईल, असेही त्यांनी नमूद केले. वरोरा शहराला जागतिक कीर्तीचे आनंदवन व ताडोबा व्याघ्र प्रकल्प यांसारखे वैशिष्ट्य लाभले असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

प्रशासकीय सोयीसाठी व प्रस्तावित तालुक्यांतील नागरिकांच्या सोईसाठी हा नवीन जिल्हा अत्यंत आवश्यक असून, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Comments