1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनाची हाक..वरोरा येथे चटप यांची भेट.

माजी आमदार वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनासाठी युवकांना हाक..

वरोरा येथे चटप यांची धावती भेट.

वरोरा/चेतन/१५/३/२६: विदर्भ राज्य निर्मितीसाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य ' अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने २०१४ मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही. यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारशी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप चटप यांनी केला आहे.

गेल्या २० वर्षात विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतंत्र विदर्भ विषयावर वामनराव चटप यांच्याशी चर्चा करण्यात आली. युवकांनी हे आंदोलन हाती घ्यावे असे मत चटप यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिवाळखोरीत असून, येथे तरुणांना रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना व आमदारांनी राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आनंदवन चौक येथील कुकूले यांच्या प्रतिष्ठानात  चर्चा करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भाचे साहित्य युवकांना वाटण्यात आले. युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे असे मत चटप यांनी व्यक्त केले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, डॉक्टर सागर वजे, समीर बारई, पंकज नौकरकार, अनिल पाटील, बाबा आगलावे, समीर हक्के  उपस्थित होते.

Comments