वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनाची हाक..वरोरा येथे चटप यांची भेट.

माजी आमदार वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनासाठी युवकांना हाक..

वरोरा येथे चटप यांची धावती भेट.

वरोरा/चेतन/१५/३/२६: विदर्भ राज्य निर्मितीसाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य ' अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने २०१४ मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही. यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारशी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप चटप यांनी केला आहे.

गेल्या २० वर्षात विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतंत्र विदर्भ विषयावर वामनराव चटप यांच्याशी चर्चा करण्यात आली. युवकांनी हे आंदोलन हाती घ्यावे असे मत चटप यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिवाळखोरीत असून, येथे तरुणांना रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना व आमदारांनी राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आनंदवन चौक येथील कुकूले यांच्या प्रतिष्ठानात  चर्चा करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भाचे साहित्य युवकांना वाटण्यात आले. युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे असे मत चटप यांनी व्यक्त केले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, डॉक्टर सागर वजे, समीर बारई, पंकज नौकरकार, अनिल पाटील, बाबा आगलावे, समीर हक्के  उपस्थित होते.

Comments