गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम.

गणेशोत्सवात नागरिकांसाठी आरोग्य शिबिर; मोरया गणेश व विराट गणेश मंडळाचा  अभिनव उपक्रम.  गणेश मंडळाचे अध्यक्ष व नगरसेवक बंडू देऊळकर व आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने समाज उपयोगी उपक्रम. विराट गणेश मंडळाकडून मोफत हेल्थ चेकअपचा लाभ घेण्याचे आवाहन. वरोरा : गणेशोत्सवाच्या उत्साहाला समाजसेवेची जोड देत मोरया गणेश मंडळ, छत्रपती शिवाजी चौक आणि शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र, टिळक वॉर्ड क्रमांक ३, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक २ मध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण १११ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये ७० पुरुष आणि ४१ महिलांचा समावेश होता. नागरिकांची बीपी, शुगर तसेच आवश्यक रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना पुढील उपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. शिबिरासाठी डॉ. गोविंद सिंग, वैभव ठाकरे, ओम उगले, सेजल बोरकर (टेक्निकल लॅब), समृद्धी दडमल (टेक्निकल लॅब), महादेव क...

वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनाची हाक..वरोरा येथे चटप यांची भेट.

माजी आमदार वामन चटप यांची विदर्भ राज्यासाठी 'स्वतंत्र विदर्भ राज्य ' आंदोलनासाठी युवकांना हाक..

वरोरा येथे चटप यांची धावती भेट.

वरोरा/चेतन/१५/३/२६: विदर्भ राज्य निर्मितीसाठी ‘स्वतंत्र विदर्भ राज्य ' अंतर्गत मोठे आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, भाजपने २०१४ मध्ये विदर्भात मते मागूनही शिवसेनेच्या विरोधामुळे राज्य देण्याचे आश्वासन पाळले नाही. यापूर्वी काँग्रेसनेही विविध समित्यांच्या शिफारशी लागू न करता जनतेची फसवणूक केल्याचा आरोप चटप यांनी केला आहे.

गेल्या २० वर्षात विदर्भातील ४७ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्यातील २ लाख ४७ हजार नोकऱ्यांचा अनुशेष लक्षात घेऊन हे आंदोलन बेरोजगारी व कुपोषण दूर करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत आंदोलकांनी व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी स्वतंत्र विदर्भ विषयावर वामनराव चटप यांच्याशी चर्चा करण्यात आली. युवकांनी हे आंदोलन हाती घ्यावे असे मत चटप यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र दिवाळखोरीत असून, येथे तरुणांना रोजगार मिळणार नसल्याने लवकरात लवकर विदर्भ राज्य निर्माण व्हावे, अशी मागणी करत आंदोलकांनी खासदारांना व आमदारांनी राजीनामे देऊन जनसंग्रामात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी आनंदवन चौक येथील कुकूले यांच्या प्रतिष्ठानात  चर्चा करण्यात आली. यावेळी स्वतंत्र विदर्भाचे साहित्य युवकांना वाटण्यात आले. युवकांनी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी व्हावे असे मत चटप यांनी व्यक्त केले. 

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, डॉक्टर सागर वजे, समीर बारई, पंकज नौकरकार, अनिल पाटील, बाबा आगलावे, समीर हक्के  उपस्थित होते.

Comments