1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावटघरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

एकार्जुना गावात भानामतीच्या अफवांनी भीतीचं सावट
घरांच्या बाहेर निंबू, कुंकू, खोबरं, तांदूळ ठेवण्याचा रहस्यमय प्रकार; महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचं वातावरण

वरोरा-प्रतिनिधी १/३/२०२६

वरोरा शहरालगत असलेल्या एकार्जुना या गावात गेल्या काही दिवसांपासून भानामतीसारख्या घटनांमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. २४ फेब्रुवारीपासून गावातील काही घरांच्या बाहेर दररोज तांदूळ, गहू, त्यावर निंबू, गुलाल, बुक्का, कुंकू आणि खोबरं अशा वस्तू ठेवण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. हा प्रकार विशेषतः सकाळी ११.३० वाजता व सायंकाळी ६ नंतर घडत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
या घटनांमुळे गावात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचं सावट पसरलं असून, अनेकजण रात्री बाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींनी यामागे अंधश्रद्धा आणि भानामतीचा संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी खोडसाळ प्रवृत्तींचा सहभाग असल्याचं मत मांडलं आहे.
या प्रकरणाची चर्चा गावभर रंगली असून नागरिकांमध्ये विविध अफवा पसरत आहेत.गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन या घटनेबाबत पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे . गावात रात्री गस्त वाढविण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.
एकीकडे काही जण याला अंधश्रद्धेचा भाग मानत असले तरी सुशिक्षित वर्ग या घटनेकडे वास्तववादी दृष्टिकोनातून पाहत आहे. भीती न बाळगता पोलिसांच्या मदतीने सत्य समोर आणणे आवश्यक आहे, असे काही सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
सध्या एकार्जुना गावात या रहस्यमय प्रकारामुळे तणावपूर्ण आणि भीतीचं वातावरण असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या घटनेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.
****

Comments