वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

 प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची चंद्रपूर जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती

बेलोरा/अमरावती : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने किशोर डुकरे यांची जिल्हाप्रमुख - प्रहार शेतकरी संघटना (चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, चिमूर, नागभीड, ब्रह्मपुरी) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

पक्षाचे कार्याध्यक्ष महेंद्र उर्फ बल्लू जवंजाळ यांनी दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी हे नियुक्तीपत्र वितरीत केले. भारतीय संविधानातील समाजवाद, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीच्या तत्त्वांवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्यामुळे डुकरे यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, कृषी कर्ज व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या रास्त मागण्यांना न्याय मिळवून देणे, ही प्रमुख कार्ये असतील. मात्र, ही नियुक्ती परिविक्षाधीन कालावधीसाठी असून, या कालावधीत कोणतेही मानधन, भत्ते किंवा आर्थिक सुविधा राहणार नाहीत, असे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नियुक्ती स्वीकारल्यानंतर आपल्या कार्यक्षेत्रात विविध शाखांचे उद्घाटन वृक्षारोपण व रक्तदान शिबिराच्या माध्यमातून करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे विदर्भातील शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

---------

Comments