1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

*"ग्रामस्थांवर सूडबुद्धीने केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन"*

 *खासदार प्रतिभा धानोरकर यांचा 'श्री सिमेंट' प्रशासनाला इशारा*

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि 'श्री सिमेंट' कंपनीच्या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यासाठी आज वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. "लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च असतो आणि प्रशासनाने त्याचा अवमान केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही," अशा कडक शब्दांत खासदार प्रतिभा  धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

या बैठकीत कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. "कंपनीने बाहेरील कंत्राटी कामगारांऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे अनिवार्य आहे," असा खंबीर पवित्रा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या सूचना दिल्या. जमिनी देऊनही रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या निष्पाप ग्रामस्थांवर कंपनी प्रशासनाने सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून बाधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप मस्के, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............

    राज्यस्तरीय अधिवेशनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित श्याम ठेंगडी सर. 
.......

Comments