वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

*"ग्रामस्थांवर सूडबुद्धीने केलेले खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन"*

 *खासदार प्रतिभा धानोरकर यांचा 'श्री सिमेंट' प्रशासनाला इशारा*

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित मागण्या आणि 'श्री सिमेंट' कंपनीच्या मनमानी कारभारावर तोडगा काढण्यासाठी आज वरोरा उपविभागीय अधिकारी कार्यालयात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. "लोकशाहीत ग्रामसभेचा निर्णय सर्वोच्च असतो आणि प्रशासनाने त्याचा अवमान केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही," अशा कडक शब्दांत खासदार प्रतिभा  धानोरकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

या बैठकीत कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन आणि स्थानिक सुशिक्षित तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न प्रामुख्याने चर्चिला गेला. "कंपनीने बाहेरील कंत्राटी कामगारांऐवजी स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देणे अनिवार्य आहे," असा खंबीर पवित्रा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्याच्या सूचना दिल्या. जमिनी देऊनही रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुणांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या निष्पाप ग्रामस्थांवर कंपनी प्रशासनाने सूडबुद्धीने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून बाधित ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संदीप मस्के, तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............

    राज्यस्तरीय अधिवेशनात जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित श्याम ठेंगडी सर. 
.......

Comments