1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

वरोरा उपविभागीय कार्यालयात ग्रामस्थांच्या समस्यांबाबत चर्चा; खासदार धानोरकर यांचे महत्त्वपूर्ण निर्देश

गावकऱ्यावरील लावलेले गुन्हे वापस घेण्याची मागणी.

वरोरा : कोंढाळा-येन्सा येथील ग्रामस्थांच्या श्री सिमेंट कंपनीसंदर्भातील विविध मागण्यांबाबत आज उपविभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ग्रामस्थांच्या समस्या आणि कंपनी प्रशासन याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार धानोरकर यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, ग्रामपंचायतीच्या नियमांना बगल देऊन कंपनीला देण्यात आलेली ५० वर्षांची एनओसी तातडीने रद्द करावी आणि ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर केला जावा. तसेच, कोंढाळा गावाचे नियमानुसार पूर्ण पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीत स्थानिक सुशिक्षित तरुणांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावर विशेष चर्चा झाली. याशिवाय, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ८ ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून ते त्वरित मागे घेण्यासाठी कंपनी प्रशासनावर दबाव निर्माण करण्याची आग्रही मागणी केली.

खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, "या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. यासाठी आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात यावी." या बैठकीतील निर्णयामुळे कोंढाळा-येन्सा परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून आपल्या मागण्यांना न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Comments