वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता* *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*

*आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता*

 *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*
 वरोडा : शाम ठेंगडी 
   यंदा तालुक्यातील आंबा झाडाला समाधानकारक बहर आल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण  व रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक मोठ्या संकटात सापडले होते.
    मात्र यावर्षी थंडीचा कडाका, कोरडे वातावरण आणि पोषक हवामान यामुळे बहुतांश आंबा झाडांना एकसारखा व दाट मोहोर फुललेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
     सूर्यप्रकाश कमी होणे, हवेत आर्द्रता वाढणे आणि तापमानात होणारा चढ उतार यामुळे मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास मोहोर गळण्याची भीती असून त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. या ढगाळ हवामानामुळे तुडतुडे, मुरी, करपा यासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 तुडतुडे ही कीड मोहोरातील रस शोषून घेते. त्यामुळे फुले कोमेजून गळून पडतात. मुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोहोर काळवंडतो आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 आंब्याचा मोहोर टिकवण्यासाठी त्यावर औषध फवारणी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते.या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. 
मोहोर या अवस्थेत असताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी, किती प्रमाणात पाणी द्यावे, कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याबाबत सूचना देण्याची मागणी आंबा उत्पादक करीत आहेत.

Comments