1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता* *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*

*आंबा बहरला, मात्र ढगाळ हवामानाने वाढवली चिंता*

 *चांगल्या उत्पादनाची आशा असताना रोग येण्याची शक्यता*
 वरोडा : शाम ठेंगडी 
   यंदा तालुक्यातील आंबा झाडाला समाधानकारक बहर आल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण  व रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादक मोठ्या संकटात सापडले होते.
    मात्र यावर्षी थंडीचा कडाका, कोरडे वातावरण आणि पोषक हवामान यामुळे बहुतांश आंबा झाडांना एकसारखा व दाट मोहोर फुललेला दिसून येत आहे. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता आहे. दरम्यान काही दिवसापासून तालुक्यात ढगाळ हवामान निर्माण झाल्याने आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.
     सूर्यप्रकाश कमी होणे, हवेत आर्द्रता वाढणे आणि तापमानात होणारा चढ उतार यामुळे मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण कायम राहिल्यास मोहोर गळण्याची भीती असून त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो. या ढगाळ हवामानामुळे तुडतुडे, मुरी, करपा यासारख्या रोगांचा धोका वाढण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे.
 तुडतुडे ही कीड मोहोरातील रस शोषून घेते. त्यामुळे फुले कोमेजून गळून पडतात. मुरी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोहोर काळवंडतो आणि उत्पादनात घट होते. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 आंब्याचा मोहोर टिकवण्यासाठी त्यावर औषध फवारणी पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे असते.या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. 
मोहोर या अवस्थेत असताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी करावी, किती प्रमाणात पाणी द्यावे, कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याबाबत सूचना देण्याची मागणी आंबा उत्पादक करीत आहेत.

Comments