वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता, पूल नाही म्हणून वंचित!कारेगाव-पारोधी रोड बांधकामाचा फायदा नाही, नालेपलीकडे शेतकरी अडले.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्ता, पूल नाही म्हणून वंचित!
कारेगाव-पारोधी रोड बांधकामाचा फायदा नाही, नालेपलीकडे शेतकरी अडले

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा-भद्रावती-मानोरा : मुख्यमंत्री ग्राम सडक योजना (CMGSY) अंतर्गत कारेगाव ते पारोधी येथील चार किलोमीटर लांबीचा रस्ता बांधण्यात आलेला असून त्यावर लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, याच रस्त्यावरील एक नाल्यावरचा पूल अजून बांधला गेला नसल्याने शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना आजही जाण्यायेण्यासाठी मोठी अडचण सोसावी लागत आहे. पूल नसल्यामुळे हा रस्ता व्यवहार्य ठरलेला नाही आणि शासनाच्या या योजनेचा उद्देशच फोल ठरला आहे.

स्थानिक उपसरपंच यांनी या संदर्भात खंत व्यक्त करत म्हटले आहे, “शासनाने मोठा रस्ता बांधला, पण पूल नाही, तर या रस्त्याचे काय उपयोग? गावकरी सिंचनासाठी, बाजारासाठी, दळणवळणासाठी अडकून पडले आहेत. या रस्त्याचा पूल हा गावाला जीवनरेषेप्रमाणे आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.”

या भागातील शेतकरी म्हणतात, “पावसाळ्यात नाला भरला की परिसर पूर्णपणे तुटतो. रस्ता असूनही आम्ही जुनीच वाट वापरावी लागते. सरकारी योजनेचा हा मोठा विसंगतीपूर्ण प्रकार आहे.”

या व्यतिरिक्त, गावात अनेक मूलभूत सोयी जसे की सिंचन व्यवस्था, पाण्याची टाकी, इतर जोडरस्ते इत्यादी कामे अजूनही अपूर्ण आहेत, ज्यामुळे गावकरी विकासापासून कोसो दूर राहिले आहेत. अनेक वर्षांपासून हे प्रश्न स्थानिक प्रशासनापुढे मांडले जात असले, तरी कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा अधिकाऱ्यांनी याकडे गंभीर लक्ष दिलेले नाही.

स्थानिक नागरिक आता मागणी करीत आहेत की, या रस्त्यासोबत पूल बांधण्याचे काम तातडीने सुरू करावे आणि गावातील इतर मूलभूत समस्याही लवकरात लवकर सोडवण्यात याव्यात. त्यांनी जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री कार्यालयाकडेही लक्ष वेधण्याचा आग्रह धरला आहे.

उपसरपंच -मानोरा-

Comments