1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

उमेद' योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर;पृथक विभाग व विमा कवचाची मागणी


'उमेद' योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर;
पृथक विभाग व विमा कवचाची मागणी

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मधील हजारो कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा आज केंद्र सरकारपर्यंत पोहोचला. चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन या योजनेतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी 'उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना'च्या प्रतिनिधींनी खासदार धानोरकर यांच्याशी संपर्क साधून योजनेतील कर्मचाऱ्यांना असलेल्या अडचणी मांडल्या होत्या. या समस्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्या केंद्रीय मंत्र्यांसमोर ठेवल्या.

खासदार धानोरकर यांनी यावेळी मंत्र्यांसमोर योजनेला स्वतंत्र विभागाचा दर्जा देण्याची, कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचे विमा कवच पुरवण्याची आणि त्यांना नियमित पगार मिळावा यासही आग्रही मागण्या केल्या. महाराष्ट्रातील ८४ लाख परिवारांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या योजनेतील हजारो कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार धानोरकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा पाठपुरावा सातत्याने चालू राहील.

Comments