वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

उमेद' योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर;पृथक विभाग व विमा कवचाची मागणी


'उमेद' योजनेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोर;
पृथक विभाग व विमा कवचाची मागणी

चंद्रपूर: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) मधील हजारो कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणाचा मुद्दा आज केंद्र सरकारपर्यंत पोहोचला. चंद्रपूर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन या योजनेतील कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी 'उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना'च्या प्रतिनिधींनी खासदार धानोरकर यांच्याशी संपर्क साधून योजनेतील कर्मचाऱ्यांना असलेल्या अडचणी मांडल्या होत्या. या समस्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी त्या केंद्रीय मंत्र्यांसमोर ठेवल्या.

खासदार धानोरकर यांनी यावेळी मंत्र्यांसमोर योजनेला स्वतंत्र विभागाचा दर्जा देण्याची, कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांचे विमा कवच पुरवण्याची आणि त्यांना नियमित पगार मिळावा यासही आग्रही मागण्या केल्या. महाराष्ट्रातील ८४ लाख परिवारांच्या भविष्याशी निगडित असलेल्या या योजनेतील हजारो कर्मचाऱ्यांचे हक्क सुरक्षित करण्याची मागणी करण्यात आली.

या प्रसंगी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. खासदार धानोरकर यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी हा पाठपुरावा सातत्याने चालू राहील.

Comments