1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

चंद्रपूरच्या आयुध निर्माणीत अनुकंपा नियुक्तीला मार्ग मोकळा; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश

 चंद्रपूरच्या आयुध निर्माणीत अनुकंपा नियुक्तीला मार्ग मोकळा; खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्याला यश

चंद्रपूर/नई दिल्ली : आयुध निर्माणी चांदा येथील अनुकंपा आधारावर नियुक्तीसाठी वाट पाहणाऱ्या कुटुंबियांसाठी आशेचा किरण दिसून आला आहे. या प्रलंबित प्रश्नावर चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्याला यश लाभले असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लगेचच २३ जणांना नियुक्ती देण्यासाठी 'वन-टाईम रिलॅक्सेशन' मंजूर केल्याचे कळले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चांदा येथील अनुकंपा धारकांच्या नियुक्तीचा प्रश्न तातडीने सोडवण्याची विनंती केली होती. संरक्षण मंत्र्यांनी या मागणीची दखल घेत लगेचच यासाठी सकारात्मक आश्वासन दिले आहे.

या आश्वासनानुसार, गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या आणि लिखित परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २३ अनुकंपा धारकांना त्वरित नियुक्ती देण्यात येणार आहे. तसेच, इतर सर्व पात्र उमेदवारांना 'वन-टाईम रिलॅक्सेशन' च्या तत्त्वावर १०० टक्के अनुकंपा नियुक्तीमध्ये समाविष्ट करण्याची मागणीही मंजूर करण्यात आली आहे. संरक्षण मंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी नोंदवले.

या यशाबद्दल खासदार प्रतिभा धानोरकर यांनी संरक्षण मंत्र्यांचे आभार मानताना म्हटले, "हा निर्णय केवळ काही कुटुंबांना नोकरी देणारा नाही, तर वर्षांपासून वाट पाहणाऱ्या शेकडो कुटुंबांना सामाजिक-आर्थिक सुरक्षा देणारा आहे."

हे आश्वासन येण्यापूर्वीच खासदार धानोरकर यांनी 'उमेद' योजनेतील कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा मुद्दा केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांसमोर मांडला होता, ज्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे चंद्रपूरमधील ग्रामीण आणि औद्योगिक क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांच्या सातत्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे.

Comments