1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू चां संशय, दोघे वाचले

वर्धा नदीत पोहताना दोन मुलांचा मृत्यू चां संशय, दोघे वाचले

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा : वरोरा शहराजवळील वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन मुलांना वाचवण्यात यश आले तर दोन मुलांना बचावण्यास अयशस्वी ठरले.
              प्रणय विनोद भोयर, वरोरा 

रविवारी दुपारी वरोरा येथील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय १३ वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय १५ वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी वरोरा शहरातून सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले.

या संकटाचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित बचावकार्य सुरू केले. 
गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र, दुर्दैवाने रुपेश आणि प्रणय ही दोन मुले खोल पाण्यात वाहून गेली आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलीस रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मृत मुलांच्या शवांचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू आहे.

या अकाली मृत्यूमुळे मुलांच्या कुटुंबीयांवर तसेच मित्र-नातेवाईकांवर कोसळलेल्या शोकाकुल संसर्गाने सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Comments