लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

आसाळा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना पाठवले सोयाबीन, हेक्टरी ५० हजार रुपये मदत मागितली.

असाळा येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना पाठवले सोयाबीन
  हेक्टरी ५० हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्यावी
     सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांची मागणी

वरोरा, दि. १० : सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांवर झालेल्या नुकसानामुळे हैराण झालेल्या आसाळा येथील शेतकऱ्यांनी गुरुवारी एक विशेष ग्रामसभा घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून खराब झालेले सोयाबीन उपडून ते लिफाफ्यात भरून जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव उईके यांना स्पीड पोस्टद्वारे पाठवले. सोयाबीन पाठवून शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.


या आधी, खांबाडा येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संकटावर नेत्यांचे लक्ष न वेधल्याची टीका केली होती. त्यानंतर पालकमंत्री अशोकराव उईके यांनी जिल्ह्याचा दौरा जाहीर केला, परंतु शेतकऱ्यांचा आरोप आहे की पालकमंत्र्यांनी फक्त महामार्गालगतच्या शेतांच पाहणी केली, त्यामुळे गावखेड्यातील शेतकऱ्यांची व्यथा त्यांना पूर्णपणे कळली नाही. हाच नाराजीचा भाव घेऊन आसाळा येथील शेतकऱ्यांनी ही विशेष ग्रामसभा बोलावली होती.
*************
जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेल्या या ग्रामसभेत तालुक्याचे शेतकरी नेते किशोर डुकरे, प्रमोद गायकवाड, भैय्याजी गायकवाड, आशिष जांभुळे यांच्या समवेत आसाळा आणि भटाळा गावातील मोठ्या संख्येने शेतकरी व शेतकरी महिला उपस्थित होत्या. शेतकऱ्यांनी ठराविक नमुन्यादाखल पालकमंत्र्यांना सोयाबीन पाठवून शासनाकडून तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, पावसाने झालेल्या नुकसानीमुळे त्यांना प्रचंड आर्थिक धक्का बसला आहे, त्यासाठी शासनाने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी.

Comments