वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात.

वरोऱ्यात बंद घरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आठ जण ताब्यात वरोरा | दि. 16 सप्टेंबर 2026 वरोरा शहरातील व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर परिसरातील एका बंद घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वरोरा पोलिसांनी छापा टाकून आठ जणांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी १८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक मनिष जगन्नाथ तालेवार यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई केली. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचांसह व्हॉल्टाज सागर कॉलनी, गुरुदेव नगर येथील महेश येलमुले यांच्या बंद घरावर छापा टाकला. यावेळी आठ जण ५२ तास पत्त्यांवर पैशांची बाजी लावून हारजीतचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच जुगाराच्या डावावर ठेवलेली रोख रक्कम व पत्ते असा एकूण १८,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी पकडल...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळवावे. 


वरोरा : वरोरा तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथे सोयाबीन पिकाच्या नाशामुळे झालेल्या आर्थिक संकटातून घायाळ झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वन दिले.
: जामगाव बुद्रुक येथे राहणारे केशव देवराव आसुटकर या शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पिकाचे दाणे काळे पडलेले पाहिले. पीक नष्ट झाल्यामुळे मजुरांना देण्यासाठी पैसे नसणे, कुटुंबाचा आर्थिक डोलारा आणि बँकेचे कर्ज या चिंतेने ग्रासलेल्या केशव आसुटकर यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींवर मोठा आघात झाला असून कुटुंबप्रमुखाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन सांत्वन पर भेट दिली . यावेळी मत्ते यांनी म्हटले की, सध्या सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्गावर मोठा आघात झाला आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडे मागणी केली की, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढू शकतात. या गंभीर परिस्थितीला सरकारने लगेच तोंड द्यावे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी. व कृषी उत्पन्न बाजार समितीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ वीस हजाराची मदत करण्याचे नियोजन करावे अशी मागणी  मते यांनी केली आहे.

याप्रसंगी बोर्डा ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण बोरूले, उमेश देशमुख , प्रवीण बदकी, लक्ष्मण ठेंगणे, शंकर ढानके, अक्षय ताजने, प्रशांत ताजने, वाल्मीक ऊमरे आधी ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments