वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा!
जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांची सांत्वन भेट

सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळवावे. 


वरोरा : वरोरा तालुक्यातील जामगाव बुद्रुक येथे सोयाबीन पिकाच्या नाशामुळे झालेल्या आर्थिक संकटातून घायाळ झालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना सांत्वन दिले.
: जामगाव बुद्रुक येथे राहणारे केशव देवराव आसुटकर या शेतकऱ्याने गेल्या दोन दिवसापूर्वी शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी करत असताना पिकाचे दाणे काळे पडलेले पाहिले. पीक नष्ट झाल्यामुळे मजुरांना देण्यासाठी पैसे नसणे, कुटुंबाचा आर्थिक डोलारा आणि बँकेचे कर्ज या चिंतेने ग्रासलेल्या केशव आसुटकर यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केली. यामुळे त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींवर मोठा आघात झाला असून कुटुंबप्रमुखाच्या निधनाने संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन सांत्वन पर भेट दिली . यावेळी मत्ते यांनी म्हटले की, सध्या सोयाबीन पीक पूर्ण नष्ट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या वर्गावर मोठा आघात झाला आहे. या संदर्भात त्यांनी सरकारकडे मागणी केली की, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना वाढू शकतात. या गंभीर परिस्थितीला सरकारने लगेच तोंड द्यावे आणि दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करावी. व कृषी उत्पन्न बाजार समितीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी तात्काळ वीस हजाराची मदत करण्याचे नियोजन करावे अशी मागणी  मते यांनी केली आहे.

याप्रसंगी बोर्डा ग्रामपंचायतचे उपसरपंच भूषण बोरूले, उमेश देशमुख , प्रवीण बदकी, लक्ष्मण ठेंगणे, शंकर ढानके, अक्षय ताजने, प्रशांत ताजने, वाल्मीक ऊमरे आधी ग्रामस्थ उपस्थित होते.



Comments