वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे?

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?

वरोरा :30/10/2025
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरा  ते भद्रावती दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून रहिवाशांसाठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, स्थानिक लोक सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेवर नाराज दिसत आहेत.

बारा ऑक्टोंबर ला टाकळी जवळील रस्त्यावर श्री. संदीप धरणेवार यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना आणि त्यांच्या मित्राला तीव्र इजा झाल्या. अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल करण्यात आले, जेथे त्यांच्या उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपये इतका प्रचंड खर्च आला आहे.

श्री. धरणेवार यांच्या प्रकरणीच नव्हे, तर भद्रावती येथील आणखी ३ ते ४ व्यक्तींचे अशाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झालेले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, मागील बऱ्याच महिन्यापासून रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचे जीविन दररोज धोक्यात आहे.

या संदर्भात एका स्थानिक नागरिकाने म्हटले आहे, "सरकारी यंत्रणा कोणाच्या मरणाची वाट बघत आहे का?" त्याने सोशल मीडिया ग्रुपमधील विविध पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून केलेल्या विनंतीत म्हटले आहे, "आपण सर्व लोक समाजाची सेवा करण्यासाठी धडपडत आहात. ही पण एक सेवाच आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडे कडक पावले उचलावीत."

या रस्त्याकडे जनप्रतिनिधीने लक्ष देऊन काम करून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त रुग्णांनी स्थानिक प्रशासनाकडे हस्तक्षेपाची कडकडीची विनंती केली असून, लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
------------

Comments