1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे?

नागपूर- चंद्रपूर हायवेवरील जीवघेणे खड्डे; सरकारी यंत्रणा कोणाच्या मृत्यूची वाट पाहत आहे का?

वरोरा :30/10/2025
नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरा  ते भद्रावती दरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडून रहिवाशांसाठी जीवघेणी समस्या निर्माण झाली आहे. या रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातांमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली असून, स्थानिक लोक सरकारी यंत्रणेच्या उदासीनतेवर नाराज दिसत आहेत.

बारा ऑक्टोंबर ला टाकळी जवळील रस्त्यावर श्री. संदीप धरणेवार यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांना आणि त्यांच्या मित्राला तीव्र इजा झाल्या. अपघातग्रस्तांना दवाखान्यात दाखल करण्यात आले, जेथे त्यांच्या उपचारासाठी सुमारे ३ लाख रुपये इतका प्रचंड खर्च आला आहे.

श्री. धरणेवार यांच्या प्रकरणीच नव्हे, तर भद्रावती येथील आणखी ३ ते ४ व्यक्तींचे अशाच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झालेले आहेत. स्थानिकांचा आरोप आहे की, मागील बऱ्याच महिन्यापासून रस्त्यावरील खड्डे  बुजविण्यात आलेले नाहीत, ज्यामुळे प्रवाशांचे जीविन दररोज धोक्यात आहे.

या संदर्भात एका स्थानिक नागरिकाने म्हटले आहे, "सरकारी यंत्रणा कोणाच्या मरणाची वाट बघत आहे का?" त्याने सोशल मीडिया ग्रुपमधील विविध पक्षांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांना संबोधून केलेल्या विनंतीत म्हटले आहे, "आपण सर्व लोक समाजाची सेवा करण्यासाठी धडपडत आहात. ही पण एक सेवाच आहे. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजविण्यासाठी संबंधित विभागाकडे कडक पावले उचलावीत."

या रस्त्याकडे जनप्रतिनिधीने लक्ष देऊन काम करून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. अपघातग्रस्त रुग्णांनी स्थानिक प्रशासनाकडे हस्तक्षेपाची कडकडीची विनंती केली असून, लवकरात लवकर या समस्येचे निराकरण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
------------

Comments