1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*ताडोबा प्रवेश शुल्क कपातीसाठी 'जिप्सी प्रवेश बंद' आंदोलन !*

*ताडोबा प्रवेश शुल्क कपातीसाठी  'जिप्सी प्रवेश बंद' आंदोलन !*

*खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचा निर्णायक एल्गार; ताडोबाच्या दारातून एकाही जिप्सीला आत सोडणार नाही*

जाहिरात
-------------------------------------------------
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) स्थानिकांना होणाऱ्या आर्थिक अन्यायाविरोधात, खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली , १ ऑक्टोबर २०२५ पासून तीव्र आंदोलन सुरू होणार आहे. स्थानिकांसाठी प्रवेश शुल्क कमी न केल्यास, नवीन पर्यटन हंगामाच्या पहिल्याच दिवशी ताडोबातील जिप्सी सफारी पूर्णपणे थांबवण्यात येईल, असा स्पष्ट आणि अंतिम इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट वनमंत्री गणेश नाईक यांना दिला आहे.

वाघांच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या स्थानिकांवरच आर्थिक भुर्दंड

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाची समस्या गंभीर असताना, त्याच जिल्ह्यातील नागरिकांकडून कोर झोनमध्ये शनिवार-रविवारसाठी तब्बल १२,६०० इतके अवाच्यासवा प्रवेश शुल्क आकारले जात आहे. या अन्यायामुळे स्थानिक नागरिकांसाठी ताडोबा दर्शन हे केवळ 'स्वप्न' बनले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, "जे नागरिक वाघांच्या हल्ल्यांमुळे जीव गमावत आहेत, त्यांनाच वाघाचे दर्शन घेण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत. ताडोबामुळे जिल्ह्याची ओळख आहे, पण आज ताडोबा येथील लोकांनाच परका झाला आहे. हा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही."

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ठामपणे सांगितले आहे की, हा इशारा केवळ एक मागणी नसून, चंद्रपूरच्या नागरिकांच्या हक्कांसाठी उभारलेले मोठे आणि निर्णायक आंदोलन असेल. शासनाने तातडीने दखल घेऊन स्थानिकांना न्याय द्यावा, अशी तीव्र अपेक्षा आहे.


*******

Comments