लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंद्रपूर जिल्हा मदत निधीच्या यादीतून वगळला; पालकमंत्री अशोक उईके यांच्या पाहणीदौऱ्यात शेतकऱ्यांचा रोष

चंद्रपूर जिल्हा मदत निधीच्या यादीतून वगळला; पालकमंत्री अशोक उईके यांच्या पाहणीदौऱ्यात शेतकऱ्यांचा रोष

चंद्रपूर : अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज वरोरा तालुक्यातील मौजे चारगाव-भेंडाळा येथे पालकमंत्री अशोक उईके यांनी जिल्ह्याच्या खासदार म्हणून पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकल्या. शेतकऱ्यांनी सरकारच्या मदत निधी योजनेत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश न होणे अन्यायकारक ठरल्याचा आरोप केला.

गेल्या महिन्याभरापासून सततच्या पावसामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कापूस आणि तूर यांसारख्या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी जाहीर केला असला, तरी जाहीर केलेल्या जिल्ह्यांच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही.

या प्रसंगी बोलताना शेतकरी नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भरभरून मते मिळवली, पण आता संकटाच्या वेळी सरकारने मदत निधीतून त्यांना वगळले आहे. एकीकडे मते मिळवणे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना संकटात सोडून देणे ही दुटप्पी नीती आहे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक उईके यांनी या विषयावर शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारने मदत निधीच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करावा आणि जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी विनंती त्यांनी शासनाकडे केली आहे.

शेतकरी संघटनांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे आणि लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात पिकांची नुकसानीचे आकडेसह अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभाताई धनोरकर , आमदार करण देवतळे, जिल्हाधिकारी, व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Comments