वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा – मुकेश जिवतोडे यांची कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी

चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा – मुकेश जिवतोडे यांची कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी

वरोरा : अलीकडील अतिवृष्टी आणि "येलो मोजॅक" या रोगराईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषतः वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, यासाठी लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी कृषी राज्यमंत्री मा. ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सोयाबीन पिकावर "येलो मोजॅक" या रोगाचा गंभीर प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात घेण्यात येणारे कापूस पीकही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठे संकट आले आहे. कर्जबाजारीपणात अडकलेले शेतकरी जीवन मरणाच्या टोकावर उभे असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात प्रचंड नुकसान होऊनही या जिल्ह्याला वगळणे हा गंभीर अन्याय असल्याचे जिवतोडे यांनी स्पष्ट केले.त्यामुळे, चंद्रपूर जिल्ह्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत दिली जावी, अशी ठाम मागणी त्यांनी कृषी राज्यमंत्रींकडे केली. शेतकऱ्यांच्या हाकेला शासनाने संवेदनशील प्रतिसाद देऊन दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केली.

*************

Comments