लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा – मुकेश जिवतोडे यांची कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी

चंद्रपूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करा – मुकेश जिवतोडे यांची कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांच्याकडे मागणी

वरोरा : अलीकडील अतिवृष्टी आणि "येलो मोजॅक" या रोगराईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. विशेषतः वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र तसेच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये, यासाठी लोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी कृषी राज्यमंत्री मा. ॲड. आशिष जयस्वाल यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, सोयाबीन पिकावर "येलो मोजॅक" या रोगाचा गंभीर प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात घेण्यात येणारे कापूस पीकही अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला असून त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठे संकट आले आहे. कर्जबाजारीपणात अडकलेले शेतकरी जीवन मरणाच्या टोकावर उभे असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान, शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नाही. प्रत्यक्षात प्रचंड नुकसान होऊनही या जिल्ह्याला वगळणे हा गंभीर अन्याय असल्याचे जिवतोडे यांनी स्पष्ट केले.त्यामुळे, चंद्रपूर जिल्ह्याचा तातडीने दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत दिली जावी, अशी ठाम मागणी त्यांनी कृषी राज्यमंत्रींकडे केली. शेतकऱ्यांच्या हाकेला शासनाने संवेदनशील प्रतिसाद देऊन दिलासादायक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही मुकेश जिवतोडे यांनी व्यक्त केली.

*************

Comments