लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

वरोऱ्यात गणेश विसर्जन मंडपाच्या जागेवरून शिवसेना-भाजप मध्ये तीव्र संघर्ष; मुख्याधिका-यांवर पक्षपातीपणाचा आरोप

वरोऱ्यात गणेश विसर्जन मंडपाच्या जागेवरून शिवसेना-भाजप मध्ये तीव्र संघर्ष; मुख्याधिका-यांवर पक्षपातीपणाचा आरोप

वरोरा,  : गणेश विसर्जनाच्या दिवशी स्वागत मंडप उभारण्यासाठीची जागा नियुक्त करण्याबाबत नगरपरिषद प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करून शहरात राजकीय वादाचे वातावरण तापले आहे. शिवसेनेने गेली चार वर्षे जोपासलेल्या परंपरागत जागेवरचा हक्क सांगत भाजपचा दावा असल्याने दोन्ही पक्षांमध्ये तीव्र वादंग उफाळला आहे.
घटनाक्रम: शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्याविसर्जनादरम्यान स्वागत आणि सत्कार करण्यासाठी शिवसेना काही वर्षांपासून एका ठराविक ठिकाणी मंडप उभारते. यावर्षी, शहर शांतता समितीची बैठक झाल्यानंतर आणि विसर्जनाची तारीख अधिकृत झाल्यानंतर शिवसेनेने नगरपरिषदेकडे मंडपासाठी परवानगीचा अर्ज दाखल केला. तथापि, प्रशासनाकडे भाजपच्या आमदार करण देवतळे यांनी विसर्जनाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच त्याच जागेसाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेचे आरोप: शिवसेनालोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी मुख्याधिका-यांवर जाणूनबुजून पक्षपाती वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, मुख्याधिकारी विशाखा शेळखी यांनी नगरपरिषदेच्या अधिकारांचा गैरवापर करून थेट भाजप आमदारांना परंपरागत जागा मंजूर करून दिली. त्यांनी या निर्णयाला 'शिवसेनेची परंपरा उद्ध्वस्त करण्याचा डाव' असे संबोधले.

प्रतिक्रिया आणि परिणाम: यानिर्णयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून, शहरभर या बाबतीत चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षाच्या तर्कानुसार, हा निर्णय लोकशाहीविरोधी असून शहराच्या सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण करणारा आहे. त्यांनी मुख्याधिकारी नेहमीच भाजपच्या दबावाखाली काम करतात असे आरोप केले आहे.

सध्या प्रशासनाने कोणत्या आधारावर हा निर्णय घेतला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. या वादामुळे उभय पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.
---

Comments