1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोऱ्यात गणेश विसर्जन मंडपाच्या जागेवरून शिवसेना-भाजप मध्ये तीव्र संघर्ष; मुख्याधिका-यांवर पक्षपातीपणाचा आरोप

वरोऱ्यात गणेश विसर्जन मंडपाच्या जागेवरून शिवसेना-भाजप मध्ये तीव्र संघर्ष; मुख्याधिका-यांवर पक्षपातीपणाचा आरोप

वरोरा,  : गणेश विसर्जनाच्या दिवशी स्वागत मंडप उभारण्यासाठीची जागा नियुक्त करण्याबाबत नगरपरिषद प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करून शहरात राजकीय वादाचे वातावरण तापले आहे. शिवसेनेने गेली चार वर्षे जोपासलेल्या परंपरागत जागेवरचा हक्क सांगत भाजपचा दावा असल्याने दोन्ही पक्षांमध्ये तीव्र वादंग उफाळला आहे.
घटनाक्रम: शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्याविसर्जनादरम्यान स्वागत आणि सत्कार करण्यासाठी शिवसेना काही वर्षांपासून एका ठराविक ठिकाणी मंडप उभारते. यावर्षी, शहर शांतता समितीची बैठक झाल्यानंतर आणि विसर्जनाची तारीख अधिकृत झाल्यानंतर शिवसेनेने नगरपरिषदेकडे मंडपासाठी परवानगीचा अर्ज दाखल केला. तथापि, प्रशासनाकडे भाजपच्या आमदार करण देवतळे यांनी विसर्जनाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच त्याच जागेसाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे.

शिवसेनेचे आरोप: शिवसेनालोकसभा संघटक मुकेश जिवतोडे यांनी मुख्याधिका-यांवर जाणूनबुजून पक्षपाती वागणूक दिल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा आहे की, मुख्याधिकारी विशाखा शेळखी यांनी नगरपरिषदेच्या अधिकारांचा गैरवापर करून थेट भाजप आमदारांना परंपरागत जागा मंजूर करून दिली. त्यांनी या निर्णयाला 'शिवसेनेची परंपरा उद्ध्वस्त करण्याचा डाव' असे संबोधले.

प्रतिक्रिया आणि परिणाम: यानिर्णयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली असून, शहरभर या बाबतीत चर्चा सुरू आहे. शिवसेना पक्षाच्या तर्कानुसार, हा निर्णय लोकशाहीविरोधी असून शहराच्या सामाजिक सौहार्दाला धोका निर्माण करणारा आहे. त्यांनी मुख्याधिकारी नेहमीच भाजपच्या दबावाखाली काम करतात असे आरोप केले आहे.

सध्या प्रशासनाने कोणत्या आधारावर हा निर्णय घेतला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. या वादामुळे उभय पक्षांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.
---

Comments