1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

गणेशोत्सवात वरोरा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश

गणेशोत्सवात वरोरा शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश

वरोरा : वरोरा शहराने पुन्हा एकदा गंगा-जमुनी तहजीबचे दर्शन घडवत हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा जोपासली. सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त वरोरा मुस्लिम एकता मंचतर्फे सर्व गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. कच्ची मस्जिदजवळ उभारलेल्या मंडपात मुस्लिम समाजबंधूंनी गणेश मंडळांचे अध्यक्ष, पोलिस अधिकारी तसेच जनप्रतिनिधी यांचा शाल, गुलदस्ता आणि श्रीफळ देऊन सन्मान केला.


ऐक्याचा उत्सव

वरोरा शहर हे नेहमीच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि शांततेचे प्रतीक राहिले आहे. येथे मोहर्रम, ईद-मिलाद, होळी, दिवाळी यांसारखे धार्मिक उत्सव सर्वजण मिळून साजरे करतात. त्याच परंपरेला पुढे नेत यंदा गणेशोत्सवातही मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला. शुभयात्रेत गणेश मंडळांच्या स्वागताने "एकता आणि बंधुभाव" यांचा संदेश पसरवला.

उपस्थित मान्यवर

या प्रसंगी वरोरा मुस्लिम एकता मंचाचे अध्यक्ष सैय्यद आसिफ रजा, ऑल इंडिया कौमी तंजीम संघटनेचे अध्यक्ष छोटूभाई शेख, नियाज सैय्यद, वसिम शेख, अन्सार रजा, मोहसीन पठाण, शब्बीर शेख, एड. तनवीर तहूर शेख, फारुख भाई, सय्यद शुजात यांच्यासह समाजातील असंख्य बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भावनेचा दुवा

या उपक्रमातून गणेशोत्सव केवळ धार्मिकतेचा नव्हे, तर सामाजिक ऐक्य आणि एकमेकांविषयी सद्भावना जोपासण्याचा संदेश देतो हे पुन्हा सिद्ध झाले. गणपती बाप्पाच्या स्वागताचा आनंद आणि मुस्लिम समाजाचे बंधुत्वभावाचे दर्शन या माध्यमातून सर्वांनाच भावले.

...........


Comments