1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे भद्रावती येथे उद्घाटन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज आणि आदिशक्ती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे भद्रावती येथे उद्घाटन
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम सम्पन्न

वरोरा 
चेतन लूतडे 

भद्रावती : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' व महिला सक्षमीकरणासाठीच्या 'आदिशक्ती अभियान' अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन सोमवारी जे. के. पॅलेस, भद्रावती येथे पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी भूषवले.

कार्यक्रमादरम्यान बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले की, ग्रामपंचायत हीच गावाच्या विकासाची खरी किल्ली असून, राज्य व केंद्र सरकारच्या योजना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम होणे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांबाबत जनजागृती करून त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी 'आदिशक्ती अभियान' ही काळाची गरज आहे.

या महत्त्वाच्या कार्यक्रमाला तहसीलदार श्री. राजेश भंडारकर, पोलीस अधिक्षक श्री. योगेश पारधी, गटविकास अधिकारी श्री. आशुतोष सपकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती पुनम गोडाम, जनप्रतिनिधी श्री. बंडू आकनुरवार, श्री. ओमकेश दराडे, डॉ. दिपक बिहातिया, श्रीमती छायाताई जंगम, श्री. मंगेश भोयर, श्री. बंडू नलावरे, श्रीमती चालेकर, श्रीमती भागवत, डॉ. शाहीज सय्यद, श्री. प्रकाश खरवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यशाळेद्वारे दोन्ही अभियानांच्या उद्दिष्टांबाबत प्रशिक्षण देण्यात आले आणि ग्रामीण भागातील विकास व महिला सक्षमीकरणाला गती देण्याचे ठरविण्यात आले.



Comments