1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात भामडेळी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू.

वनविभागाचे गावकऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार

चंद्रपूर 
चेतन लूतडे 

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात दुपारी वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. ही घटना बुधवार दुपारी अंदाजे बारा वाजता भांमडेळी गावाजवळ घडली.


मृतक अमोल बबन नन्नावरे (वय ४५) हे भांमडेळी गावाचे रहिवासी होते. स्थानिक नागरिकांनुसार, इरई धरणाच्या बाजूला  ते शेतातील  कापूस पिकावर फवारणी मारत असताना अचानक जंगलातून बाहेर आलेल्या भीमा नावाच्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी त्यांचे वडील आणि मित्र त्या ठिकाणीच काम करीत होते. आरडा ओरड केल्यानंतर काही वेळाने मृतदेह सोडून वाघ जंगलात गेला. मात्र तोपर्यंत नन्नावरे  यांचा जीव गेला होता.  वनविभाग गावकऱ्यांच्या तक्रारी व सूचनावर लक्ष देत असून प्राण्यांचे हल्ले गावकऱ्यांवर वाढलेले आहे.

घटनेची खबर मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, घटनेची तपासणी सुरू आहे. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांमध्या रोष व नैराश्याचे वातावरण आहे.
या घटनेमुळे अमोल नवरे यांच्या कुटुंबावर मोठा धक्का बसला आहे. ते आपल्या पत्नी आणि दोन मुलांसहित एक छोटेसे कुटुंब सोडून गेले आहेत. त्यांचा मृत्यू या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या उघड्यावर पडण्यासारखी परिस्थिती निर्माण करेल, अशी चिंता नातेवाईक व्यक्त करत आहेत.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील गावांमध्ये माणस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढत आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात वाघ, बिबट इत्यादी वन्यजीवांचे हल्ले वाढले आहेत, ज्यामुळे स्थानिक शेतकरी आणि रहिवाशांचे जीवन धोक्यात असल्याची चिंता गावकरी करीत आहे. 

Comments