वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

आणि बच्चुभाऊ कडू माढळीच्या सभेला आलेच नाही. मी माढळीला नक्की येईल बच्चुभाऊ कडूंचे फोनवरून आश्वासन

आणि बच्चुभाऊ कडू माढळीच्या सभेला आलेच नाही.  मी माढळीला नक्की येईल बच्चुभाऊ कडूंचे फोनवरून आश्वासन                                       

अनिल नौकरकार 

 माढेळी: प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे सभा आज 23 सप्टेंबरला नेताजी सुभाष चंद्र बोस चौकामध्ये नियोजित होती परंतु अचानक प्रकृती बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाही असे वरोरा तालुका संघटक अमोल काटकर यांनी सांगितले परंतु यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती.           
        
माढेळी येथे तालुका आयोजक अमोल काटकर यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांची सभा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी सभेतून बच्चुभाऊ कडू गर्जना करतील अशी आशा शेतकऱ्यांना होती यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिंदोडा , मार्डी, गाडेगाव तर वर्धा जिल्ह्यातील शेकापूर धानोरा तसेच माढळी व नागरी परिसरातील पाच ते सहा हजार शेतकरी बच्चुभाऊ कडूंची भाषण ऐकण्यासाठी एकत्र आले होते परंतु बच्चुभाऊ न आल्यामुळे शेत कऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे सकाळी दहा वाजेपासूनच माढेळी गावात शेतकऱ्यांची गर्दी जमू लागली होती सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रदीप पाल चौधरी यांच्या सप्त खंजिरी भजनाने लोक भारावून गेले बच्चुभाऊ कडू खांबाडा येथे मोर्चाला संबोधित करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची समजते परंतु त्यांनी फोनवरून तालुका संघटक अमोल काटकर व शेतकऱ्याची संवाद साधून मी माढेली येथे नक्की येईल असे सांगितले जाहीर सभेला प्रहार कार्याध्यक्ष बबलु जंजाळ,विदर्भ प्रमुख गजू कुबडे,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण हेडवे,जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी संबोधित केले.

पाथरी येथील सभा

Comments