1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

संविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

संविधान रक्षणासाठी निर्णायक लढा, नागपूरच्या भूमीतून उठला संघर्षाचा बिगुल!

नागपूर 
आज नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने "संविधान सत्याग्रह" पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू श्री. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक दीक्षाभूमी येथून झाला. संविधानाचे रक्षण, देशातील एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देश असून, या पदयात्रेचा समारोप २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे होणार आहे.
राज्य तसेच देशभरात संविधानावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू असताना संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आता आली असल्याचा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या पवित्र संविधानाची प्रत संघाला प्रदान करण्यात येईल.

या ऐतिहासिक पदयात्रेत मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहून संविधान रक्षणाच्या या लढ्यात माझा ठाम सहभाग नोंदवला आणि देशातील लोकशाही मूल्यांचे जतन व संविधानाची अखंडता राखण्यासाठी एकजुटीचा संकल्प केला. यावेळी माझ्यासह सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे, आ. अभिजीत वंजारी, मा.आ. सुभाष धोटे, श्रीमती सुषमाताई अंधारे यांसह काँग्रेसचे अनेक मान्यवर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.


Comments