वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला


वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात येत्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वरोरा शहरातील आंबेडकर चौकात हे आंदोलन भरवण्यात येणार आहे. आयोजकांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या रोगांमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले असतानाच, अलीकडील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात या पिकांनाही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत केलेला नसल्याचेही आरोप केले जातात. भाजपचे कर्जमाफीचे निवडणूकीतील आश्वासनही फेटाळले गेले आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

या आंदोलनाद्वारे शेतकरी चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि शेतमालाला योग्य भाव देणे यासहित अनेक मागण्या करणार आहेत.

Comments