1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला

वरोरा तालुक्यात शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन ३० सप्टेंबरला


वरोरा : वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे त्रस्त असून, शासनाने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही आणि शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप करत शेतकरी नेत्यांच्या नेतृत्वात जेलभरो आंदोलन करणार आहेत.

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते आणि सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांच्या नेतृत्वात येत्या ३० सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता वरोरा शहरातील आंबेडकर चौकात हे आंदोलन भरवण्यात येणार आहे. आयोजकांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार, विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या रोगांमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले असतानाच, अलीकडील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि भात या पिकांनाही नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीतही राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत केलेला नसल्याचेही आरोप केले जातात. भाजपचे कर्जमाफीचे निवडणूकीतील आश्वासनही फेटाळले गेले आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.

या आंदोलनाद्वारे शेतकरी चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे आणि शेतमालाला योग्य भाव देणे यासहित अनेक मागण्या करणार आहेत.

Comments