लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

व्होल्टास कॉलनीचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी अस्ताव्यस्त; नागरिकांचे आमदारांना निवेदन.

व्होल्टास कॉलनीचा मुख्य रस्ता खड्ड्यांनी अस्ताव्यस्त; नागरिकांचे आमदारांना निवेदन. 

अन्यथा न.प. टॅक्स भरणार नाही. 

वरोरा 
अनिल नौकरकार 

वरोरा : वरोरा रेल्वे स्टेशन ते मोहबाळा चौक या मुख्य रस्त्याची दयनीय स्थितीमुळे व्होल्टास कॉलनीतील रहिवाशांना अनेक वर्षे त्रास सहन करावा लागत आहे. या नियोजित १२ मीटर रुंदीच्या रस्त्यावर जागोजागी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहतूक खूपच अवघड झाली आहे. रोजच्या अनेक अपघातांमुळे नागरिक भयभीत आहेत आणि प्रशासनाकडे त्वरित दुरुस्तीची मागणी करत आहेत.
हा रस्ता केवळ व्होल्टास कॉलनीसाठीच नव्हे, तर एमआयडीसीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, शाळकरी मुलांसाठी आणि आजूबाजूच्या खेड्यांमधून येणाऱ्या शेकडो नागरिकांसाठी देखील महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात येथील परिस्थिती आणखीन हलाखीची होते. आनंदवन चौक, सरदार पटेल वार्ड येथील पाणी या कॉलनीत शिरते. नाल्यांची नियमित सफाई न झाल्यामुळे घाण आणि पाणी साचते, ज्यामुळे आरोग्यासंबंधी समस्या निर्माण होत आहेत.

कॉलनीतील रहिवासी प्रामाणिकपणे नगरपरिषद कर भरत असतात . टॅक्सचे मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र गेल्या काही वर्षीपासून नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे स्टेशन चौक ते मोहबाळा चौकापर्यंतचा रस्ता योग्य प्रकारे दुरुस्त करण्यासाठी वरोरा-भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देण्यात आले आहे. या मागणीसाठी बंडूभाऊ लभाने, बंडू कातोरे, अनिल नौकरकार, गजानन महानकर, गोपाल राजपूत, संजय वैद्य, मंगेश मल्हार, अरुण दळवी, रमेश अंड्रस्कर यासहित अनेक रहिवाशांनी आवाज उठवला आहे.

नागरिकांची मागणी आहे की, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे आणि त्यांना दिलासा द्यावा. अन्यथा नगरपालिकेचा टॅक्स भरणार नाही असाही इशारा दिलेला आहे.



Comments