वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

राज्यगीत आता बंधनकारक!** शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड


**राज्यगीत आता बंधनकारक!**  

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड 

फक्त बातमी 

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर "गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत बंधनकारकरीत्या गाण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने जाहीर केला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, हा नियम **मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी सह सर्व माध्यमांच्या शाळांना** लागू असेल.

 प्रत्येक शाळेच्या सकाळच्या प्रार्थनेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत सादर करणे अनिवार्य राहील.  
पालन न करणाऱ्या शाळांवर: शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे, *"नियम मोडणाऱ्या शाळांवर शासन कठोर कारवाई करेल."  
हा निर्णय शैक्षणिक आदर्शांबरोबरच **राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीला** प्राधान्य देणारा पहिला मोठा कार्यक्रम आहे. "गर्जा महाराष्ट्र माझा" गीतातील शब्द प्रत्येक मराठी माणसाच्या अस्मितेशी जोडलेले असल्याने, त्याचा सामूहिक गायनाने विद्यार्थ्यांमध्ये सामूहिकत्वाची भावना निर्माण होण्यास मदत होईल.

शिक्षण विभाग या आदेशाची अंमलबजावणी तातडीने सुरू करणार असून, शाळांना अधिकृत सूचना आधीच पाठवण्यात आल्या आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन शैक्षणिक वर्षापासून ही पद्धत सुरू होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना मिळणार हेल्थ कार्ड 

मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यापुढे त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत केली जाईल आणि शालेय विद्यार्थ्यांना आता आरोग्याच्या तपासणीनंतर एक हेल्थ कार्ड दिले जाईल अशी माहिती दिली आहे.

यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी औपचारिक होती मात्र आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. शिवाय मुलांच्या आरोग्याबाबतचे हेल्थ कार्ड सुद्धा त्यांना दिले जाणार आहे.


Comments