लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

दोन कुत्र्यांनी एका वाघाला जंगलात पळवले. ताडोबा अभयारण्यात वाघाने गावाजवळ मांडले बस्तान वनविभाग सतर्क.

गावकऱ्यांची सावधगिरी आणि कुत्र्यांचे धाडस, वाघाचा हल्ला निष्फळ.
ताडोबा अभयारण्यात वाघाने गावाजवळ मांडले बस्तान  वनविभाग सतर्क.

वरोरा 
चेतन लूतडे 
चंद्रपूर, (23/8/2025): चेतन लूतडे 

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहरली ते मुधोली रस्ता पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले असले तरी, आता तेथे अनेक वाघाच्या उपस्थितीमुळे अशांतता निर्माण झाली आहे. शुक्रवारपासून एका वाघाने सिताराम पेठ गावाजवळ बस्तान मांडले असून गावातील शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना धोका निर्माण झाला आहे.

शुक्रवारी दुपारी या वाघाने गाईबैलांच्या कळपावर हल्ला चढवला. याचे चित्रीकरण झाले असून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये गाईवर हल्ला केल्यानंतर दोन कुत्र्यांनी मिळून वाघावर चढाई केली यानंतर वाघ जंगलात पळून गेला. गावकऱ्यांच्या सावधतेमुळे व कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे वाघाला शिकार करता आली नाही. असे असले तरी, सिताराम पेठ गावात या वाघाची दहशत पसरली आहे. याबरोबर या ठिकाणी दोन वाघ अजून आहेत. वनविभागाने या संबंधात तातडीने संरक्षण उपाय सुरू केले आहेत.
सिताराम पेठ ते मोहरली या भागात वाघांची संख्या वाढली असून, भर दिवसा पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वनविभागाने या ठिकाणी गाड्या थांबवण्यास मनाई केली असून, प्रत्येक ठिकाणी वनकर्मचारी नियुक्त केले आहेत. मात्र, गावातील काही युवक मोठ्या धाडसाने वाघाजवळ जाऊन आरडाओरड करताना दिसून येतात, ज्यामुळे धोक्याची शक्यता वाढली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना व पर्यटकांना सूचना दिल्या आहेत की ते सतर्क राहावेत व वनविभागाच्या मार्गदर्शनाखेरीज धोकादायक क्षेत्रात जाऊ नयेत. ताडोबाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षेच्या खबरदारीची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

(सिताराम पेठ येथील युवक मंगेश ढोक यांनी हा व्हिडिओ चित्रीत केले आमच्या पोर्टलतर्फे धन्यवाद)
व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा. 
बातम्या पाठवण्यासाठी 9579734429 या नंबर वर संपर्क साधा.

Comments