1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

निर्भीड व्यक्तिमत्त्वाचे राजू जाजूर्ले यांवर एकार्जुना चौकात अज्ञात युवकांनी केला हल्ला .


निर्भीड व्यक्तिमत्त्वाचे राजू जाजूर्ले यांवर एकार्जुना चौकात अज्ञात युवकांनी केला हल्ला .

वरोरा, ३ ऑगस्ट २०२५
प्रतिनिधी 

सकाळी अंदाजे ११:३० वाजता एकार्जुना चौक येथे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व 'एम एच ३४' व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन राजू जाजूर्ले (राजू भाऊ) यांच्यावर ८ ते १० अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. घटनेत जाजूर्ले यांना घेराव घालून जोरदार मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांना ओळखत नसल्याचे त्यांनी पोलिसांना नमूद केले आहे.  

ऐकरजुना चौकात त्यांचे मित्र सपन डे यांच्यासोबत बसून असताना अचानकपणे अनोळख्या युवकांनी घेराव घालून "माझ्या भावाला काय म्हटले" म्हनत हल्ला झाला. व हल्लेखोरांनी ठिकाणावरून पलायन केले.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये  संदिग्ध युवक कैद असल्याची माहिती प्राप्त झाली असून  वरोरा पोलिस  त्या दिशेने तपास करीत आहे. 
 
जाजूर्ले सध्या खाजगी वैद्यकीय उपचार घेत असून, त्यांची स्थिती स्थिर आहे.  

वरोरा पोलीस स्टेशनमध्ये जाजूर्ले यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिस घटनेच्या मागचा हेतू आणि हल्लेखोरांची ओळख शोधत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, *"या मारहाणीमागे राजकीय किंवा सामाजिक कारना व्यतिरिक्त अजूनही कारण असू शकते"* अशी शंका व्यक्त केली जात आहे, कारण जाजूर्ले सोशल मीडियावर निर्भीडपणे विचार मांडतात. तथापि, अद्याप घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.  
***********

Comments