लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

मराठा आरक्षण चळवळीवरून चंद्रपुरात ओबीसी समाजाचा निषेध

मराठा आरक्षण चळवळीवरून चंद्रपुरात ओबीसी समाजाचा निषेध

चंद्रपूर 
अंकुश अवथे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मुंबईकडे कूच सुरू केली आहे. मात्र त्यांच्या या पावलाचा चंद्रपुरात तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
आज चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात ओबीसी समाजाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.अशोक जीवतोडे म्हणाले की, मनोज जरांगे हे काही विशिष्ट नेत्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठीच मुंबईकडे निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्या नोंदी ‘कुणबी’ आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र द्यावे, मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काही राजकीय नेते, मनोज जरांगे यांना पुढे करून राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप जीवतोडे यांनी केला.


Comments