वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

मराठा आरक्षण चळवळीवरून चंद्रपुरात ओबीसी समाजाचा निषेध

मराठा आरक्षण चळवळीवरून चंद्रपुरात ओबीसी समाजाचा निषेध

चंद्रपूर 
अंकुश अवथे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत मुंबईकडे कूच सुरू केली आहे. मात्र त्यांच्या या पावलाचा चंद्रपुरात तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
आज चंद्रपूर शहरातील वरोरा नाका चौकात ओबीसी समाजाकडून निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली मनोज जरांगे यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.अशोक जीवतोडे म्हणाले की, मनोज जरांगे हे काही विशिष्ट नेत्यांच्या सांगण्यावरून आंदोलन करत असून मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यासाठीच मुंबईकडे निघाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही. ज्यांच्या नोंदी ‘कुणबी’ आहेत, त्यांनाच प्रमाणपत्र द्यावे, मात्र सरसकट मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.यासोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काही राजकीय नेते, मनोज जरांगे यांना पुढे करून राज्यातले वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचाही आरोप जीवतोडे यांनी केला.


Comments