1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तीकेंद्र : मीरा कडबे*

*भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तीकेंद्र : मीरा कडबे*

वरोडा : शाम ठेंगडी

भगवा ध्वज राष्ट्रजीवनातील स्फूर्तिकेंद्र आहे. सध्या धर्म आणि संस्कृती यांवर विविध आघात होत असून त्यांचा यथाशक्ती प्रतिकार केला पाहिजे. कधीकधी विचारांच्या विसंगतीमुळे चमत्कारिक स्थिती निर्माण होते. आताच्या काळात स्त्री साक्षरतेपेक्षा तिचे एकूण सशक्तीकरण काळाची गरज आहे. व्यक्तीचे विचार हे कालसापेक्ष असतात.राष्ट्रासाठी त्याग व समर्पण करण्याची प्रेरणा देण्याचे सामर्थ्य भगव्या ध्वजात आहे. यातून उत्तम संघटन आणि युवा पिढी घडविण्याचे काम होते, असे विचार नागपूर येथील नरकेसरी प्रकाशनाच्या संचालीका आणि कुटुंब उद्बोधक मीराताई कडबे यांनी व्यक्त केले.        

           श्रीराम मंदिर देवस्थान येथे 13 जुलै रोज रविवारला झालेल्या राष्ट्र सेविका समितीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात  उद्बोधक म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रा. से. समितीच्या नगर कार्यवाहीका अपूर्वा बुजोणे व्यासपीठावर उपस्थित होत्या. 

 ‌.       मीरा कडबे यांनी लव्ह जिहाद सारख्या दुर्दैवी मुद्द्यांचा कायमस्वरूपी नायनाट व्हावा आणि आपत्ती व संकटाच्या काळात आजच्या स्त्रीने खंबीर होण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.
          ध्वजारोहण आणि समिती प्रार्थनेनंतर रसिका घुडे यांनी प्रास्ताविक  केले. पल्लवी धनेगावकर यांनी वैयक्तिक तर शुभा रेलकर हिने सांघिक गीत सादर केले. आर्या घुडे हिने अमृत वचन तर अवंती घुडे यांनी सादर केले. मयुरी घुडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता डॉ. जयश्री शास्त्री यांनी गायलेल्या वंदे मातरमने झाली.


Comments