1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*‘साथी अभियानाच्या’ माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी आधारकार्ड शिबीर*

*‘साथी अभियानाच्या’ माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी आधारकार्ड शिबीर*

चंद्रपूर, दि. 12 : निराश्रीत बालकांना ओळख आणि प्रतिष्ठा, त्यांची आधार नोंदणी, बालकांचे कायदेशीर सक्षमीकरण आणि शाळाबाह्य गरीब वस्तीत राहणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले प्राथ व उच्च प्राथ शाळा, चंद्रपूर येथे आधार कार्ड शिबीर घेण्यात आले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून महिला बालकल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन, जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन  प्रोजेक्ट,  हृदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या प्रभारी सचिव ए.  झेड. खान तर प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे,  जिल्हा परिवेक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, अजय साखरकर, मुख्याध्यापिका भारती पाजणकर, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे उपस्थित होते.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे मत खान मॅडम यांनी व्यक्त केले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनीही मार्गदर्शन करताना, शासन तुमच्या सदैव पाठीशी राहील. पालकांनी प्रशासनाला सहकार्य करून बालकांना शाळेत विशेष प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा,  असे प्रतिपादन केले. यावेळी न्यायाधीश खान व महिला बल विकास अधिकारी भस्मे यांच्या समक्ष शाळेतील तक्रार पेटी उघडण्यात आली. 

निराधार मुलांचे कायदेशीर सक्षमीकरण करण्याचे काम " साथी अभियान " अंतर्गत सुरू आहे. यावेळी प्रकाश नगर, अष्टभुजा वॉर्डातील मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले.  सदर साथी अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वस्त्यांमध्ये सामाजिक सेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जवळपास 300 पेक्षा जास्त बालकांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन  शशिकांत मोकाशे यांनी केले तर आभार मारोती दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला संध्या तोगर, अजय पवार, मारोती कोसे, विवेक चिमूरकर, राणी मेश्राम, रश्मी भोयर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळा प्रशासनाचा विशेष सहभाग लाभला.

Comments