वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे

*श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे*  

*वरोरा* : 
श्री संत गजानन महाराजांचे जीवन अलौकिक चरित्र आणि आध्यात्मिक शिकवणींनी भरलेले आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि कृपा भक्तांच्या भाग्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन *गजानन बावन्नी*चे रचयिते प्रा. सुरेश शेवडे (आबा) यांनी श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या *अमृतकण* प्रवचन कार्यक्रमात केले.  

९० वर्षीय प्रा. शेवडे यांनी महाराजांच्या चरित्रातील अनेक अनुभव रसाळ शैलीत सांगितले. *"महाराज गुणातीत आहेत. त्यांना सदाचारी भक्त प्रिय आहेत. ज्यांनी मनापासून श्रद्धा केली, त्यांच्या जीवनात महाराज स्वतः प्रकट झाले आणि कृपा केली,"* असे ते म्हणाले.  

हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि गजानन महाराजांचे तत्त्वज्ञान*
प्रा. शेवडे यांनी हिंदू धर्माच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना सांगितले, *"हिंदू धर्म ईश्वरप्रणीत असून तो जगातील श्रेष्ठ धर्म आहे. इतर धर्म मानवनिर्मित पंथ आहेत, म्हणूनच वेद-पुराणे जगभर पूज्य मानली जातात."*  

*पादुका परिक्रमा आणि भक्तांचा उत्साह**  
कार्यक्रमापूर्वी वरोरा नगरात पादुका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती, जिथे रांगोळी आणि पुष्पवृष्टीने भक्तांनी स्वागत केले. यावेळी *बाळकृष्ण कुळसंगे (उल्हासनगर)* यांनी आपले अनुभव सांगितले तसेच *अमृतकण* या ग्रंथाचे विमोचनही करण्यात आले.  

कार्यक्रमाचे संचालन *उमेश लाभे* यांनी तर प्रास्ताविक *राजीव दोडके* यांनी केले. मुंबई, यवतमाळ, चंद्रपूरसह अनेक भागांतून आलेल्या भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.  

**भक्ती आणि सदाचाराचा संदेश देणारा हा प्रसंग भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.**  


Comments