1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे

*श्री संत गजानन महाराजांच्या अमृतकण प्रवचनात भक्तांच्या जीवनातील भाग्याचे लक्षण म्हणजे महाराजांची कृपा — प्रा. सुरेश शेवडे*  

*वरोरा* : 
श्री संत गजानन महाराजांचे जीवन अलौकिक चरित्र आणि आध्यात्मिक शिकवणींनी भरलेले आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि कृपा भक्तांच्या भाग्याचे लक्षण आहे, असे प्रतिपादन *गजानन बावन्नी*चे रचयिते प्रा. सुरेश शेवडे (आबा) यांनी श्री संत गजानन महाराज भक्त परिवाराच्या *अमृतकण* प्रवचन कार्यक्रमात केले.  

९० वर्षीय प्रा. शेवडे यांनी महाराजांच्या चरित्रातील अनेक अनुभव रसाळ शैलीत सांगितले. *"महाराज गुणातीत आहेत. त्यांना सदाचारी भक्त प्रिय आहेत. ज्यांनी मनापासून श्रद्धा केली, त्यांच्या जीवनात महाराज स्वतः प्रकट झाले आणि कृपा केली,"* असे ते म्हणाले.  

हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि गजानन महाराजांचे तत्त्वज्ञान*
प्रा. शेवडे यांनी हिंदू धर्माच्या वैशिष्ट्यावर प्रकाश टाकताना सांगितले, *"हिंदू धर्म ईश्वरप्रणीत असून तो जगातील श्रेष्ठ धर्म आहे. इतर धर्म मानवनिर्मित पंथ आहेत, म्हणूनच वेद-पुराणे जगभर पूज्य मानली जातात."*  

*पादुका परिक्रमा आणि भक्तांचा उत्साह**  
कार्यक्रमापूर्वी वरोरा नगरात पादुका परिक्रमा आयोजित करण्यात आली होती, जिथे रांगोळी आणि पुष्पवृष्टीने भक्तांनी स्वागत केले. यावेळी *बाळकृष्ण कुळसंगे (उल्हासनगर)* यांनी आपले अनुभव सांगितले तसेच *अमृतकण* या ग्रंथाचे विमोचनही करण्यात आले.  

कार्यक्रमाचे संचालन *उमेश लाभे* यांनी तर प्रास्ताविक *राजीव दोडके* यांनी केले. मुंबई, यवतमाळ, चंद्रपूरसह अनेक भागांतून आलेल्या भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.  

**भक्ती आणि सदाचाराचा संदेश देणारा हा प्रसंग भाविकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.**  


Comments