1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा*

*जिल्हाधिका-यांनी घेतला जलजीवन मिशनचा आढावा*

चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचा, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.17) आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा) प्रदीप बाराहाते, निलिमा मंडपे (जलसंधारण विभाग), संजय अष्टगी (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, सहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ उपस्थित होते.

जिल्ह्यातील नागरिकांना जलजीवन मिशन अंतर्गत 100 टक्के नळ जोडणी देण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ज्या योजना पूर्ण झाल्या असतील, त्यामधून पाणी सुरू होणे आावश्यक आहे. तरी सुध्दा भौतिकदृष्ट्या काही किरकोळ कारणाने सदर योजना रखडल्या असतील, तर त्या त्वरीत पूर्ण करून घ्या. महावितरणच्या कामामुळे पूर्ण न झालेल्या योजनांचा पाठपुरावा करावा. अर्धवट राहिलेल्या पाणी पुरवठा योजनांचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतंत्र आढावा घ्यावा. त्याकरीता खनीज विकास मधून निधी देता येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते म्हणाले, ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत 1684 योजना असून यापैकी 1005 योजना भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 833 योजनांमधून पाणी सुरू आहे. डिसेंबर 2026 पर्यंत उर्वरीत सर्व योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

०००००००

Comments