वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित


वारा-पावसामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवन बाधित

वरोरा (चेतन): 9/6/2025
सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कच्च्या घरांची पडझड, झाडे उन्मळून पडणे, विजेच्या खांबांची दुरावस्था अशा समस्यांना तालुक्यातील लोक सामोरे गेले आहेत.  

वाऱ्याच्या जोरामुळे तालुक्यातील अनेक कच्ची घरे कोसळली असून हुडकी येथे अनेक घरांची छपरे उडून गेली आहेत. यामुळे गरीब घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे. तसेच, आनंदवन परिसरात अनेक मोठी झाडे रस्त्यावर पडली असून काही मार्ग सकाळपर्यंत बंद होते. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात झाड पडले असून, सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.  
विजेच्या खांबांना झालेल्या नुकसानामुळे तालुक्यातील अनेक भागात विजेचे पुरवठ्यात व्यत्यय आला होता. विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी लाईन दुरुस्तीसाठी तातडीने काम सुरू केले आहे.  

या संकटकाळात गरजूंना मदत मिळावी यासाठी संबंधित विभागाने लगेच दखल घेऊन पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील प्रशासनाकडून पीडितांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
...........

Comments