1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*वरोरा तालुक्यातील शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाला भीम आर्मीचा पाठिंबा, जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष मागण्या सादर*

*वरोरा तालुक्यातील शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाला भीम आर्मीचा पाठिंबा, जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष मागण्या सादर*

वरोरा, ७ मे २०२५:
चेतन लूतडे 
 वरोरा तालुक्यातील आबमक्ता गावातील शेतकरी विकास खोब्रागडे* यांनी अतिक्रमित वन हक्क जमिनीवर होत असलेल्या विकास प्रकल्पा व्यतिरिक्त उर्वरित जमीन मिळण्याकरिता  **आमरण उपोषण** सुरू केले आहे. उपोषणाच्या २७व्या दिवशीही प्रशासनाकडून कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया न मिळाल्यास, किंवा यादरम्यान मृत्यू झाल्यास "माझ्या मृत्यूस प्रशासन जबाबदार असेल"  असा इशारा दिला आहे.

 प्रकरणाची पार्श्वभूमी:  
- शेतकऱ्याच्या **वाहत्या शेतीच्या जमिनीवर** (सर्वे नंबर ८३ व ९२) विद्युत विभागाचे सबस्टेशन बांधण्यास ग्रामपंचायतने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा वाद नर्माण झाला. 
- खोब्रागडे यांचा दावा आहे की, ४० वर्षे त्यांच्या कुटुंबाने या जमिनीवर शेती केली आहे. सबस्टेशनमुळे जमीन हस्तांतरित झाल्याने त्यांचा परिवार *निराधार झाला आहे.  
- त्यांनी जमिनीची पुनर्मोजणी करण्याची मागणी केली आहे, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची **तातडीने चौकशी** करावी अशी मागणी केली आहे.  

भीम आर्मीचा पाठिंबा:  
भीम आर्मीच्या **भारत एकता मिशन तर्फे अतुल पाटील(तालुका संघटक), भाग्यश्री पवार (शहर प्रमुख) व मंगेश पवार यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर निवेदन सादर केले. त्यांनी खोब्रागडे यांना न्याय मिळण्यासाठी प्रशासनाला पावले उचलण्याची मागणी केली आहे.  

 उपोषणाचा कालावधी:  
खोब्रागडे यांनी ११ एप्रिल २०२५ पासून त्याच्या शेतात उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास ही चळवळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.  

मागण्या:  
१. सर्वे नंबर ८३ व ९२ ची पुनर्मोजणी करून जमीन हक्क स्पष्ट करणे.  
२. शेतकऱ्याला पर्यायी जमीन  देणे.  
३. प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्वरित चौकशी करणे.  

प्रशासनाने लगेचच या प्रकरणात हस्तक्षेप करून संवाद साधण्याची गरज आहे, अन्यथा परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.  

Comments