1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्यार्थिनीस शैक्षणिक मदत प्रदान*


*डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना अंतर्गत विद्यार्थिनीस शैक्षणिक मदत प्रदान*

भद्रावती :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजनेअंतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे.

याच उपक्रमाअंतर्गत डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅमन्ड रिसर्च, नागपूर येथे B.Com (CA) द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या कु. वैष्णवी मोरेश्वर तराळे हिला शैक्षणिक शुल्कासाठी आर्थिक मदत करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा प्रमुख मा. रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले व तालुका प्रमुख नंदू पढाल यांच्या हस्ते कु. वैष्णवी हिला धनादेश प्रदान करण्यात आला.

मा. रविंद्र शिंदे यांचे सामाजिक, शैक्षणिक व जनहिताचे कार्य आज प्रत्येकाच्या नजरेत भरते आहे. गरजू विद्यार्थ्यांसाठी नेहमी धावून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थी वर्गात एक प्रेरणास्रोत म्हणून समोर आले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.

"आपला माणूस" म्हणून जनतेच्या मनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते सातत्याने कार्यरत असून, अशा व्यक्तिमत्त्वाचा आधार लाभणं हे समाजासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने भाग्याचे लक्षण आहे.

Comments