1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

*‘नरकातला स्वर्ग’ – हुकूमशाहीविरुद्ध संघर्षाची यशोगाथा' पुस्तक वितरित करुन प्रस्थापित जुलमी व्यवस्थेविरोधात जागृती*

*‘नरकातला स्वर्ग’ – हुकूमशाहीविरुद्ध संघर्षाची यशोगाथा' पुस्तक वितरित करुन प्रस्थापित जुलमी व्यवस्थेविरोधात जागृती*

*शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचे अभियान*

भद्रावती:

जुलमी सत्तेच्या अन्यायकारक कारवायांपुढे न झुकता, अपार हिमतीने लढा देणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या माध्यमातून एक आगळीवेगळी प्रेरणादायी वास्तविकता समाजासमोर मांडली आहे. या पुस्तकाचे नुकतेच मुंबई येथे मोठ्या उत्साहात प्रकाशन पार पडले. आता हे पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे.

या पुस्तकाच्या हजारावर प्रति बोलावून चंद्रपूर जिल्ह्यातील पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, अभियंता, व्यावसायिक, शासकीय अधिकारी, राजकीय तथा सामाजिक क्षेत्रातील सक्रिय पदाधिकारी व मान्यवर आदींना वितरीत करण्याचे अभियान शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे राबवीत आहेत.

हे पुस्तक केवळ शब्दांचे संकलन नसून, ते संघर्षाचा आणि सत्यासाठीच्या लढ्याचा एक दस्तावेज आहे. तुरुंगात असताना शिवसेना नेते तथा खासदार राऊत यांनी अतिशय धैर्याने आणि शांततेने या पुस्तकाचे लेखन केले. चुकीच्या आरोपांखाली त्यांना तुरुंगवास भोगावा लागला, पण त्यांनी कधीही अन्यायासमोर आपली मान झुकवली नाही. जुलमी सत्तेने त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी लेखणीच्या माध्यमातून सत्याला जगासमोर आणले.

या पुस्तकात त्यांना तुरुंगात असताना सातत्याने भेटणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या निवडक निकटवर्तीयांचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये चंद्रपूरचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांचाही उल्लेख करण्यात आला आहे, हे विशेष.

‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक विशेषतः युवा पिढीसाठी एक प्रेरणास्रोत आहे. अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ, परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्यासाठीचा लढा न सोडण्याचं बळ यातून शिकता येते. आजही जनतेचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे आणि खा. संजय राऊत यांच्या संघर्षाने तो अधिक दृढ झाला आहे. त्यांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, हीच आजच्या पिढीसाठी खरी आदर्श शिदोरी आहे. हे पुस्तक प्रत्येक तरुणाने वाचावं, आत्मसात करावं आणि आपल्यातल्या लढवय्या वृत्तीला जागं करावं, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी या अभियानाच्या निमित्ताने मांडले आहे.

Comments