वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला.लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपासअज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू.

वरोऱ्यात दुचाकी चोरांचा धुमाकूळ; हिरो स्प्लेंडरवर चोरट्यांचा डल्ला. लोकमान्य शाळेजवळून हिरो स्प्लेंडर लंपास अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून तपास सुरू वरोरा : शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असून आणखी एका मोटारसायकल चोरीची नोंद वरोरा पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी साहील वासुदेव ढवस (रा. मुक्ता, ता. मारेगाव, जि. यवतमाळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, फिर्यादीने त्यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (क्र. MH-29 BM-7107) ही मोटारसायकल 11 जुलैच्या रात्री लोकमान्य शाळेजवळील मित्राच्या रूमसमोर उभी केली होती. 12 जुलै रोजी सकाळी सुमारे 8 वाजता गाडीच्या ठिकाणी गेल्यानंतर ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. परिसरात शोध घेऊनही मोटारसायकल मिळून न आल्याने पोलिसांत तक्रार देण्यात आली. चोरीस गेलेल्या दुचाकीची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील...

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

17 दिवसापासून शेतकऱ्याचे आमरण उपोषण 

वरोरा येथील आबा मक्ता येथील शेतकऱ्याला केले भूमीहीन.

वरोरा 
चेतन लूतडे 

वरोरा तालुक्यातील आबा मक्ता या गावांमध्ये गेल्या 40 वर्षापासून वन हक्काच्या अतिक्रमित जागेवर शेती करीत असलेल्या शेतकऱ्याला भूमिहीन करण्यात आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचा परिवार उघड्यावर पडला असून गेल्या 17 दिवसापासून आमरन उपोषणासाठी शेतकरी आपल्या शेतात बसले आहे. 

सर्वे क्रमांक 83 मध्ये विद्युत विभागाचे १३ kv सब स्टेशन बनणार असून यासाठी ग्रामपंचायतीने साठ आर जमीनचा ठराव मंजूर करून विद्युत विभागाच्या ताब्यात दिली आहे. केल्या कित्येक वर्षापासून शेतकरी याच जागेवरती आपली शेती करीत होता. त्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. 

मात्र आता प्रशासनाने आपला प्रस्ताव बदलला असून शेतकऱ्याची ही जमीन नाही ती  सर्वे नंबर 92 मध्ये आहे. असा चुकीचा प्रस्ताव केला आहे. पण या वन हक्क अतिक्रमित जागेवरती दुसराच शेती वाहत आहे.

८३ आर मध्ये दोन हेक्टर शेती वरती शेतकरी विकास बाळकृष्ण खोब्रागडे हे गेल्या 40 वर्षापासून शेती करीत आहेत. मात्र कराची पावती भरत असताना 92 सर्वे नंबर  वरती टॅक्स देऊन  चुकीची पावती भरण्यात आली होती. शेतकऱ्याला हाच सर्वे नंबर 92 आहे असा समज दिला होता. शेतकरी शिक्षित नसल्याने या बाबीचा उलगडा झाला नव्हता. मात्र आता सरकारने विद्युत विभागातर्फे नवीन सबस्टेशन बनविण्यासाठी सर्वे नंबर 83 मधील जागा देऊन या शेतकऱ्याला भूमीहीन केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

ही बाब माहिती होताच भीम आर्मी व भारत एकता मिशन चंद्रपूर यांनी शेतकऱ्याला पाठिंबा दर्शवित वरोरा येथे पत्रकार परिषद घेतली.
यामध्ये शेतकऱ्याची पूर्ण जमीन मोजावी. व उर्वरित जमीन वाहण्यासाठी देण्यात यावी. या पद्धतीची मागणी करण्यात आली आहे. 
मात्र अजूनपर्यंत प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नसून शेतकऱ्याला समजावण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करणे सुरू आहे. गावातील सरपंचांनी सुद्धा या बाबीची दखल न घेतल्याने शेतकऱ्याने आपल्या शेतातच उपोषण सुरू केले आहे. 
लोकप्रतिनिधी,जिल्हाधिकारी, महसूल प्रशासनाला याबाबत  बरेच निवेदन दिले असून अजून पर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही.
त्यामुळे भीम आर्मी आणि भारत एकता मिशन चे अतुल पाटील तालुका संघटक, भाग्यश्री पवार, उपेंद्र ढोक  यांनी शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून भूमीन केलेल्या शेतकऱ्याला जोपर्यंत योग्य न
न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा लढण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.



Comments