1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड करणार 10वी च्या परीक्षांवर पुनःविचारखासदार धानोरकरांच्या पत्राची दखल

केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड करणार 10वी च्या परीक्षांवर पुनःविचार
खासदार धानोरकरांच्या पत्राची दखल

वरोरा 


केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने अलिकडेच नविन शैक्षणिक धोरणाअंतर्गत 10वी च्या परिक्षा पद्धतील बदल करण्यासंदर्भात आराखडा तयार केला आहे. यामध्ये 10वी च्या परीक्षा दोन वेळा होणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या मानसिक व शारिरीक त्रासाची दखल घेत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाला पत्र पाठवून प्रचलित पद्धतीत बदल करु नये अशी मागणी पत्राद्वारे केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाने खासदारांच्या मागणी ची दखल घेऊन वरील निर्णणयावर पुनःविचार करणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.

नविन परिक्षा पद्धीत दोन वेळा होणाऱ्या परीक्षा या मार्च व मे महिन्यात होणार आहे. सदर कालावधीत विदर्भासह महाराष्ट्रात उन्हाची दाहकता अधिक असल्याने विद्यार्थ्यांना शारिरीक व मानसिक तासाला समोर जावे लागणार आहे. त्यासोबच, शाळांदेखील सदर परिक्षा पदृधीत अडचणी च्या ठरणार आहे. या कारणात्सव खासदार धानोरकर यांनी सदर परीक्षा पद्धतील विरोध करुन एकच परिक्षा सुरु ठेवण्याची मागणी केली होती. या संदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डा ने खासदार धानोरकर यांची शिफारस मान्य केली असून लवकरच बोर्ड यावर निर्णय घेणार असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. असे झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना याचा सोयीचे होणार आहे.

Comments