1

प्रति  माननीय गटशिक्षण अधिकारी साहेब, पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर. विषय-अंशकालीन निदेशक नेमणूक करताना होत असलेल्या अन्यायाबाबत. अर्जदार- विशाखा विलास गुजर टिळकवाड वरोरा जिल्हा चंद्रपूर, संपर्क ९५७९७३४२२९.  महोदय. मी सौ विशाखा विलास गुजर (लुतडे) राहणार वरोरा. सध्या मी पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आनंदवन येथे सन २०१२ पासून २०१९ पर्यंत अंशकालीन निदेशक पदावर कार्यरत होते. सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या मार्फत गुणांकन व मुलाखत प्रक्रियेनंतर दिनांक १९/७/ २०२५ रोजी मला अंशकालीन कला निदेशक पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते. या पदावर माझी मेरिट पद्धतीने निवड करण्यात आली होती.  मात्र एका महिन्याच्या आतच गटशिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांच्या सहीचे पत्र मला प्राप्त झाले ज्या द्वारे माझी नियुक्ती ७/८/२०२५ पासून रद्द करण्यात आल्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले त्यामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागला . मी २०१६ पासून पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदवन शाळेमध्ये कला निदेशक पदावर कार्यरत...

कृषी पंपासाठी मागेल त्याला सोलर शेतकऱ्यासाठी ठरवता डोकेदुखी

कृषी पंपासाठी मागेल त्याला सोलर शेतकऱ्यासाठी ठरवता डोकेदुखी 

वरोरा

 सन 2021 नंतर शेतकर्यांनी कृषी पंपासाठी अर्ज दाखल केले होते त्या सर्व शेतकर्याना कृषी पंप विज जोडणी झाली आहे .
सन २०२१ नंतर कृषी पंप विज जोडणीसाठी अर्ज केलेले तालुक्यातील जवळपास ७०० शेतकरी अजुनही विज जोडणीचा प्रतीक्षेत आहे. तसेच केंद्र व राज्यसरकार यांचा अधीसूचने नुसार सर्व शेतकऱ्याना सोलर घेण्याचा सूचना दिल्या आहेत.
आता शेतकरीर्यानी विज जोडणी साठी अर्ज केला असता सर्व शासनाच्या ऑनलाईन साईड बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्या नवीन विज जोडणी परवाना मिळणे बंद झाले आहे . आज पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कृषी पंपसाठी जे काही डिमांड भरले होते, त्याच्या वर वाढीव शुल्क आकारून त्याच परवान्यावर सोलर चे डिमांड भरून मागेल त्याला सोलर या योजनेत शेतकऱ्यांना सोलर देण्यात यावे असे राज्य सरकारचा आदेश आहे. तसेच काही शेतकरी स्वतः पैसे लावून आपल्या शेतात विज घेत होते,या योजनेमुळे काही शेतकरी यांना तात्काळ विज मिळत होती मात्र ही योजना सरकार ने बंद पाडली आहे .
त्यामुळे शेतकर्यांना आता सोलर घेतल्या शिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही.सोलर ही योजना नैसर्गिक आपत्ती तसेच बिघडा मुळे शेतकरी यांना डोके दुःखी ठरत असून परिसरातील शेतकरी बंद पडलेली विज जोडणी योजना सुरु करून शेतकर्यांना विज देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शेतकरी नेते  किशोर डुकरे तसेच शेतकरी करीत  आहे.


Comments